Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
अ.नगरशिर्डी

साईसंस्थान महिला सुरक्षा रक्षक बेबीताई नागरे यांनी सापडलेले सुमारे साडे सत्तावीस हजार रु. त्या साईभक्ताला केले परत!

शिर्डी ( प्रतिनिधी). आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान मध्ये असणाऱ्या कर्मचारी यांच्याकडून शिर्डीत संस्थान परिसरात साईभक्तांचे गहाळ झालेले, हरवलेले पाकीटे, दागिने प्रामाणिकपणे त्यांना परत केले जात असून ही परंपरा कौतुकास्पद आहे. असे साईभक्तांकडून आता बोलले जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डीत आतापर्यंत अनेक साईभक्त यांचे पाकीट हरवली, दागिने गहाळ झाले. मात्र ते कर्मचाऱ्यांना स्वच्छता करताना किंवा इतरत्र सापडले असता त्यांनी ते प्रामाणिकपणे आपल्या अधिकाऱ्यांकडे जमा केले. अधिकाऱ्यांनी ओळख पटवून त्या साई भक्तांना ते प्रामाणिकपणे परत केले. अशा प्रामाणिकपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा साई संस्थांनच्या तर्फे सन्मानही करण्यात येतो.


दिनांक 28/10/2024. रोजीही शिर्डीत साईगुरुस्थान मंदिर परिसरात येथे ड्युटीला असणारी महिला सुरक्षा रक्षक श्रीमती बेबीताई नागरे यांना 27520/- रु सापडले. त्यांनी प्रामाणिकपणे संरक्षण ऑफिसला ते परत केले. ऑफिस मधील अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता ते पैसे साईभक्त शारदा शामसुंदर( चेन्नई) यांचे असल्याचे समजल्याने ते ओळख पटवून त्या साई भक्तांना परत केले.

बेबीताई नागरे ह्या अतिशय प्रामाणिक कर्मचारी आहेत. यापूर्वी देखील त्यांना वीस हजार रु. सापडले होते. त्यावेळीही त्यांनी ‌ते परत केले होते. त्या कोपरगाव वरून येजा करतात, वय झालेले आहे, परंतु आपली ड्युटी अतिशय प्रामाणिक करतात. अश्या प्रामाणिक कर्मचाऱ्यामुळे साईबाबा संस्थानचे भक्तांमध्ये नावलौकिक वाढते.

संस्थान कर्मचाऱ्यांचा हा प्रामाणिकपणा साई भक्तांद्वारे देशात परदेशातही पोहोचला जातो. अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा संस्थानही यथोचित सत्कार करून त्यांच्या प्रामाणिक पणाचे कौतुक केले जाते. श्रीमती बेबीताई नागरे यांचा ही साईसंस्थांन तर्फे सन्मान करून त्यांचे कौतुक होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button