Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
अ.नगरक्राईम

शाळाही सुरक्षित नाहीत; राहात्यात पोलिसांचा धाक संपलाय का? जि.प. शाळेत घरफोडी-पोलिसी गस्त कुठे होती?

राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, राऊत वस्ती, केलवड बु. येथे झालेल्या घरफोडीने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळेसारख्या संवेदनशील व सार्वजनिक ठिकाणी अज्ञात चोरटे सहज कुलूप तोडून चोरी करतात, याचा अर्थ गाव-वस्त्यांमध्ये पोलिसांचा वचक उरलेला नाही का? असा सवाल नागरिक करत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दुपारी ४ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शाळेचे मुख्य गेट, कार्यालय आणि पाकगृह फोडले जाते, मात्र एकाही टप्प्यावर पोलिसांना संशयास्पद हालचालींची माहिती मिळत नाही, ही बाब चिंताजनक आहे. रात्रीची गस्त नेमकी कुठे होती? गावातील शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक इमारती यांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर आहे,

असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी ठेवलेला धान्यसाठा चोरीला जाणे म्हणजे थेट विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास पळवण्यासारखे आहे. तरीही चोरीनंतरच गुन्हा दाखल होतो, प्रतिबंधात्मक कारवाई कुठे आहे? अज्ञात चोरट्यांचा अद्याप सुगावा लागलेला नसल्याने तपासाची दिशा व गतीवरही प्रश्न निर्माण झाले आहेत.
वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून,


👉 रात्रीची गस्त वाढवणार का?
👉 संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त का नाही?
👉 सीसीटीव्ही, ग्रामसुरक्षा समित्या फक्त कागदावरच आहेत का?
असे थेट प्रश्न आता पोलिस प्रशासनाला विचारले जात आहेत.
जर शाळाच सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा तरी कुणाकडून करायची? अज्ञात चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button