Letest News
राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती?
अ.नगरक्राईम

शाळाही सुरक्षित नाहीत; राहात्यात पोलिसांचा धाक संपलाय का? जि.प. शाळेत घरफोडी-पोलिसी गस्त कुठे होती?

राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, राऊत वस्ती, केलवड बु. येथे झालेल्या घरफोडीने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळेसारख्या संवेदनशील व सार्वजनिक ठिकाणी अज्ञात चोरटे सहज कुलूप तोडून चोरी करतात, याचा अर्थ गाव-वस्त्यांमध्ये पोलिसांचा वचक उरलेला नाही का? असा सवाल नागरिक करत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दुपारी ४ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शाळेचे मुख्य गेट, कार्यालय आणि पाकगृह फोडले जाते, मात्र एकाही टप्प्यावर पोलिसांना संशयास्पद हालचालींची माहिती मिळत नाही, ही बाब चिंताजनक आहे. रात्रीची गस्त नेमकी कुठे होती? गावातील शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक इमारती यांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर आहे,

असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी ठेवलेला धान्यसाठा चोरीला जाणे म्हणजे थेट विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास पळवण्यासारखे आहे. तरीही चोरीनंतरच गुन्हा दाखल होतो, प्रतिबंधात्मक कारवाई कुठे आहे? अज्ञात चोरट्यांचा अद्याप सुगावा लागलेला नसल्याने तपासाची दिशा व गतीवरही प्रश्न निर्माण झाले आहेत.
वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून,


👉 रात्रीची गस्त वाढवणार का?
👉 संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त का नाही?
👉 सीसीटीव्ही, ग्रामसुरक्षा समित्या फक्त कागदावरच आहेत का?
असे थेट प्रश्न आता पोलिस प्रशासनाला विचारले जात आहेत.
जर शाळाच सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा तरी कुणाकडून करायची? अज्ञात चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button