Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
राजकीयशिर्डी

सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परिवाराची ३५ वर्षांची प्रेरणादायी परंपरा

साकुरी (प्रतिनिधी) : गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वावर शिर्डीत लाखो साईभक्त दर्शनासाठी येतात. अनेक जण शेकडो-हजारो किलोमीटरचा प्रवास करून थकलेले असतात. अशा प्रत्येक भक्ताला प्रेमाने, आपुलकीने आणि सन्मानाने पोटभर अन्न मिळावे, या एकाच भावनेतून श्री साई भगवती प्रतिष्ठानने यंदाही सलग तीन दिवस भव्य अन्नदान महायज्ञ आयोजित केला. तब्बल ३५ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या सेवायज्ञातून यंदा १० हजारांहून अधिक साईभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वनाथ अय्यर आणि उपाध्यक्ष प्रसाद अय्यर यांच्या सेवाभावी संकल्पनेतून उभी राहिलेली ही परंपरा आज हजारो साईभक्तांसाठी आधार ठरत आहे. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रेमाने वाढण्यात आलेल्या महाप्रसादात केवळ अन्न नव्हते, तर त्यामध्ये साईसेवेची भक्ती, माणुसकीची ऊब आणि निस्वार्थ प्रेमाची चव होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


यावेळी बोलताना अध्यक्ष विश्वनाथ अय्यर म्हणाले, “गुरुसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. श्री साईबाबांच्या कृपेने गेली ३५ वर्षे आम्ही हा सेवायज्ञ अखंड सुरू ठेवला आहे. आमच्यासाठी प्रत्येक साईभक्त म्हणजे साक्षात साईबाबांचे रूप आहे. त्यामुळे एकही भक्त उपाशी जाऊ नये, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटावे, हाच आमचा खरा प्रसाद आहे.”
या महायज्ञासाठी प्रतिष्ठानचे ५० हून अधिक सेवेकरी तीन दिवस अहोरात्र कार्यरत होते. घाम गाळत, कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी हजारो भाविकांना प्रेमाने महाप्रसाद वाढला. त्यांच्या चेहऱ्यावरील सेवाभाव आणि भक्तांच्या डोळ्यातील समाधान पाहून अनेकांचे मन भरून आले.
उत्तर प्रदेशातून आलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही या उपक्रमाला भेट देत अय्यर परिवाराच्या सेवाभावी कार्याचे मनापासून कौतुक केले. “ही केवळ अन्नदानाची सेवा नाही, तर साईबाबांच्या शिकवणीचा जिवंत संदेश आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.


दान करणारे अनेक असतात; पण भक्तांच्या डोळ्यातील भूक ओळखून प्रेमाने ताट वाढणारे हात फारच थोडे असतात. श्री साई भगवती प्रतिष्ठानची ही ३५ वर्षांची अखंड अन्नसेवा म्हणजे साईबाबांच्या ‘सबका मालिक एक’ आणि ‘श्रद्धा-सबुरी’ या संदेशाचे जिवंत दर्शनच आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button