Letest News
समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात! गुरुपौर्णिमेत मोठा दरोडा उधळला! शिर्डी रेल्वे स्टेशनजवळ दरोड्याच्या तयारीत असलेले ७ आरोपी शस्त्रांसह... गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी शिर्डीत भक्तीचा महासागर-लाखो साईभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन अढळ श्रद्धेचा सुवर्णमुकुट! आंध्रच्या साईभक्ताकडून श्री साईबाबांच्या चरणी ८२.३९ लाखांचा सुवर्ण मुकुट ...
अ.नगरक्राईम

समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी

राहाता (प्रतिनिधी) : राहाता येथील समता पतसंस्थेच्या शाखेत कथित बनावट खाती उघडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात तत्कालीन शाखा व्यवस्थापक मिलिंद बनकर तसेच पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांनाही अटक करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे.
या प्रकरणात आधीच आरोपी अशोक उर्फ कॅप्टन खरात याच्यावर कारवाई सुरू असताना, त्या काळातील शाखेच्या कारभाराची जबाबदारी व्यवस्थापकांवर होती. त्यामुळे शाखेत उघडण्यात आलेल्या कथित बनावट खात्यांबाबत तसेच संबंधित कागदपत्रांच्या वापराबाबत तत्कालीन व्यवस्थापकांची भूमिकाही तपासली जावी, अशी मागणी व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


काही नागरिक व माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, “प्राथमिक चौकशीवर वेळ न दवडता संबंधित जबाबदार व्यक्तींवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी. पुरावे नष्ट होण्याची शक्यता टाळण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले.
दरम्यान, या कथित गैरव्यवहारामुळे पतसंस्थेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ठेवीदारांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पोलीस व संबंधित तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button