Letest News
जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन ठगसेन भूपेंद्र सावळेचे साथीदार फरार आरोपींना कोणाचे अभय?" – DGP समोर डॉ. राजेंद्र पिपाडांचा संतप्त स... "साईनगरीत वाढत्या गुन्हेगारीवर डॉ. पिपाडांचा पोलिस महासंचालकांना भावनिक पत्र " श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु...
राजकीयशिर्डी

दर्शनापुरती उरली-शिर्डी विकास शून्य-राजकारण शंभर टक्के!-जेष्ठ न्यायाविधीतज्ञ् तथा माजी उपनगराध्यक्ष अनिल जी शेजवळ

शिर्डी ही साईबाबांची पवित्र भूमी आहे. पण आज या भूमीत श्रद्धेपेक्षा अराजक, सेवाभावापेक्षा स्वार्थ आणि विकासाऐवजी राजकारण दिसत आहे. साईबाबांच्या नावावर जगणारी साईनगरी आज हळूहळू ओस पडत चालली आहे, आणि हे कुणाच्या लक्षात येत नाही — किंवा येऊनही मुद्दाम दुर्लक्ष केलं जात आहे.
आज वास्तव असं आहे की भाविक शिर्डीकडे पाठ फिरवत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


कारण काय?
साईबाबा बदलले? नाही.
भाविकांची श्रद्धा कमी झाली? नाही.
मग दोष कुणाचा? — इथल्या व्यवस्थेचा, प्रशासनाचा आणि स्थानिक राजकारणाचा.
नागर–मनमाड रस्ता म्हणजे शिर्डीचा श्वास. पण आज तो रस्ता नाही, तो मृत्यूचा सापळा बनला आहे. खड्डे, धूळ, अपघात आणि त्रास — या सगळ्यांतून भाविकांना शिर्डीत यायचं आहे. हा रस्ता पाहून भाविक म्हणतात, “दर्शनापेक्षा प्रवासच जास्त शिक्षा

आहे.” याला जबाबदार कोण?
👉 रस्ते खातं?
👉 लोकप्रतिनिधी?
👉 की साईबाबांच्या नावावर फक्त फोटो काढणारे पुढारी?
याहून भयानक वास्तव म्हणजे —
शिर्डीत दर्शनाव्यतिरिक्त शून्य विकास.
भाविक आला, रांगेत उभा राहिला, दर्शन घेतलं आणि लगेच निघून गेला.
का?


कारण इथे थांबावं असं काहीच नाही.
ना पर्यटन, ना स्वच्छता, ना नियोजन, ना सुसंस्कृत शहराचा अनुभव.
इतर तीर्थक्षेत्रे बघा — तिथं भाविक देवासोबत शहरावर प्रेम करून परत जातो.
शिर्डीत मात्र भाविक त्रास, लूट आणि अस्वस्थता घेऊन परत जातो.
आज शिर्डीमध्ये विकासाचा नाही तर सत्तेचा खेळ सुरू आहे.


नगरपालिका, अधिकारी, नेते — सगळे आपापल्या खुर्चीच्या भोवती फिरत आहेत.
साईभक्त, व्यापारी, स्थानिक नागरिक — यांचं भविष्य कुणाच्याच अजेंड्यावर नाही.
आज स्पष्ट शब्दांत सांगतो —
ही स्थिती बदलली नाही, तर शिर्डी भाविकांचं नव्हे तर फक्त बोर्डावरचं तीर्थक्षेत्र उरेल.
आणि तेव्हा दोष देण्यासाठी साईबाबा नसतील —


दोषी असतील आपणच.
साईबाबा हे कुठल्याही पक्षाचे नाहीत.
पण आज त्यांच्या नावावर अपयश झाकलं जात आहे.
राजकारण बाजूला ठेवा, नाहीतर उद्या शिर्डी वाचवायला कोणी उरणार नाही.
हा लेख इशारा आहे.
आज नाही जागे झालो, तर उद्या साईनगरीचं अस्तित्व प्रश्नात येईल.
जय साईराम.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button