Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

शिर्डीत मानपानाच्या नावाखाली नवविवाहितेचा छळ- पतीसह सहा जणांवर गुन्हा!

शिर्डी : लग्नातील मानपानाच्या नावाखाली एका नवविवाहितेवर अमानुष अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हुंडा व पैशांच्या हव्यासापोटी पतीसह सासरच्या मंडळींनी केलेल्या छळामुळे अखेर पीडितेला घराबाहेर काढण्यात आले असून, या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, १६ मे २०२५ रोजी शिर्डीत थाटामाटात विवाह पार पडला. मात्र लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच खरी परिस्थिती समोर आली. “मानपान मिळाला नाही, दोन तोळे सोने नाही, तुझे वडील निकम्मे आहेत” अशा अपमानास्पद शब्दांत सतत मानसिक छळ सुरू झाला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


याचबरोबर व्यवसायासाठी ५ लाख रुपये आणण्याचा दबाव टाकत विवाहितेला वारंवार त्रास देण्यात आला. पैसे न आणल्यास मारहाण, अपमान आणि उपेक्षा अशी वागणूक देण्यात येत होती. इतकेच नव्हे, तर चारित्र्यावर संशय घेऊन “हे लग्न जबरदस्तीने झाले” असे म्हणत तिच्या सन्मानालाच तडा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सततचा छळ असह्य झाल्यानंतरही संसार टिकवण्याच्या आशेने पीडिता सहन करत राहिली. मात्र दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी तिला निर्दयीपणे घरातून बाहेर हाकलण्यात आले, आणि तिच्या आयुष्याला मोठा धक्का बसला.
या घटनेनंतर पीडितेने धाडस दाखवत संभाजीनगर कौटुंबिक न्यायालयात घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली. तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १४४(१) अन्वये पती अक्षय निर्मळ, सासू-सासरे, नणंद व इतर नातेवाईक अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


📢 संतप्त प्रतिक्रिया:
👉 “मानपानाच्या नावाखाली छळ कधी थांबणार?”
👉 “हुंड्याच्या लालसेने किती आयुष्ये उद्ध्वस्त करणार?”
👉 “अशा आरोपींवर कठोर शिक्षा व्हायलाच हवी!”
⚠️ इशारा:
लग्नातील मानपान, हुंडा किंवा पैशांसाठी होणारा छळ हा केवळ सामाजिक कलंक नाही, तर गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अन्यथा अशा विकृत प्रथा समाजात वाढतच राहतील.
👉 एकच संदेश – “छळ सहन करू नका, आवाज उठवा!”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button