Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
अ.नगरराजकीय

मुंबईत कोरोना!दोघांचा मृत्यू!तरी अधिक काळजी घेण्याची गरज!

शिर्डी ( प्रतिनिधी) सन २०१९ आणि त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोविडने पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. वाढत्या कोविड रुग्णांमध्ये, मुंबईत केईएम रुग्णालयात दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. या दोन्ही रुग्णांचे कोविड रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

परंतु रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे की एका रुग्णाचा मृत्यू कर्करोगामुळे झाला. तर, दुसऱ्याचा किडनीच्या गंभीर आजाराने झाला आहे. तथापी डॉक्टर आणि बीएमसी अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्यास सांगितले आहे. आणि लोकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे.

परळ येथील ५९ वर्षीय महिलेचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. महिलेला कर्करोग होता, रुग्णालयाने मृतदेह कुटुंबाला देण्यास नकार दिला. कुटुंबाने माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्याशी संपर्क साधला. अनिल कोकीळ म्हणाले की, महिलेला कर्करोग होता, परंतु तिचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला.

अशा परिस्थितीत, रुग्णालयाने प्रोटोकॉलनुसार मृतदेह कुटुंबाला दिला नाही. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी बोलल्यानंतर, मृतावर कोविड प्रोटोकॉलनुसार कुटुंबातील फक्त दोन सदस्यांसह भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

यामुळे परत कोरोना येतो की काय? अशी भीती नागरीकांना वाटत आहे.तरी यापुढे प्रशासन,आरोग्य विभाग,व नागरीकांनी अधिक खबरदारी घेतली पाहिजे.असे बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button