
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मराठा समाज बांधवाने डिजिटल फलक लावत मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने काय भूमिका घ्यावी.महायुतीला पाठिंबा द्यावयाचा महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावयाचा?
मराठा समाज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संभ्रमात पडला आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी सांगितल्या प्रमाणे महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता.मात्र महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आरक्षणाबाबत जाहिरपणे किंवा ठोस आश्वासन मिळाले नाही.
जरांगे पाटील यांना प्रश्न विचारत बार्शी मधील अण्णासाहेब शिंदें या मराठा नेत्याने डिजिटल फलक लावले आहे.जरांगे पाटील यांनी खुलासा नाही केला तर,बार्शी मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.