
मराठ्यांना सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह आरक्षण हवं आहे. आम्ही त्यासाठीच आंदोलन सुरु केलं आहे. त्याची अमलबजावणी झाली नाही तर विधानसभेला सगळ्यांची फजिती केल्याशिवाय सोडणार नाही.
जाहिरात
माझ्या समाजाची लेकरं मोठी झाली पाहिजेत यासाठीच मी जिवाची बाजी लावली आहे. आमचं काही कुणी शत्रू नाही. सगे-सोयऱ्यांच्या अमलबजावणीचा विचार करत असतील तर चांगली गोष्ट आहे. एवढा विरोध मी पत्करला आहे तो मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांसाठीच केला आहे. सगे-सोयऱ्यांची अमलबजावणी आमच्या अटींप्रमाणे केली तर आम्ही काय म्हणणार? शिवाय ते टिकवण्याची जबाबदारीही सरकारची आहे असंही मनोज जरांगे म्हणाले.
DN SPORTS