शिर्डी प्रतिनिधी
श्री साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचारी यांनी उज्जेन येथील साईभक्ताला ४० लाखाचा गंडा घातला अशी माहितीची अनेक दिवसापासून चर्चा सुरु होती परवा दैनिक साई दर्शन ह्या वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाली ती वाचण्यात आल्या नंतर मनात विचार आला कि जर खरोखरच असा प्रकार घडला असेलतर संस्थानने याची सखोल चौकशी करून कारवाई करायला पाहिजे होती
तसे न झाल्याने संस्थानच्या अधिकारी यांच्या बाबत मनात शंका निर्माण होत असल्याचे समीर वीर यांनी सांगितले पुढे समीर वीर यांनी सांगितले कि संस्थानचे काही कर्मचारी पैशे घेतात महागडे गिफ्ट घेतात हे काय नवीन नाही असे अनेकदा प्रकरणे झालेली आहेत
परंतु एखाद्या भक्तास गंडा घातल्याचे हे ऐकल्यावर नवलच वाटायला लागले आहे संस्थानने हि बातमी प्रकाशित होताच संबंधित त्या कर्मचारीवर कारवाई करणे अपेक्षित होते कारण कि त्या भक्ताने संस्थानाचे कार्यकारी अधिकारी यांना घडलेल्या प्रकारची माहिती दिलेली असतांना संस्थानकडून काहीच कारवाई झालेली दिसत नाही गंडा घातलेली माहिती चुकीची आहे
असे गृहीत धरले तर बातमी प्रकाशित करणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल केला पाहिजे अश्याने देशभरात शिर्डीचे नाव बदनाम होत चालले आहे तेव्हा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी यांनी याची सखोल चौकशी करून संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी किंवा शिर्डीची बदनामी करणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर वीर यांनी केली आहे