Letest News
अबब! साई संस्थान हादरले — संस्थानमधील ४७ कर्मचाऱ्यांनी साईबाबांच्या झोडीत हात घातला”“शेवटी साईबाबांच... पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट टीमचे श्री साईबाबा समाधी दर्शन शिवमहापुराण कथा –पोलिसांचे नियोजन फळास गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांवर धडक कारवाई-२६ आरोपींना अटक मिश्राला साईबाबांची एलर्जी महाराष्ट्र हि साईंची शिवांची आणि संतांची भूमी साईबाबा हे आमचे देवचं नाहीत... रेखा जरे हत्याकांडात मोठी घटना! — बाळबोठे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कोपरगाव – करंजी शाळेत दाखले वाटप; नायब तहसीलदार सातपुते यांच्या उपस्थितीत उपक्रमाची प्रशंसा साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी तांब्याची छत्री केली अर्पण आजचा दिवस शिर्डीकरांसह संपूर्ण साईभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक —श्री साईबाबा महासमाधी दिन गुन्हे प्रतिबंध आणि पुढील योजना-ऑपरेशन मुस्कान – पार्ट 2 : शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही' उद्धव संतापले -मतदार यादी दुरुस्त करा- नंतरच निवडणुका राज ठाकरे-मतदार ...
अ.नगरक्राईम

वसंत देशमुख जिथे असतील त्यांना ताब्यात घ्या निवडणूक आयोगाने ही कडक कारवाई करावी चंद्रशेखर बावनकुळे

भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून जी काही कडक कारवाई वसंत देशमुख याच्यावर झाली पाहिजे, ती आम्ही करू.” असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संगमनेरमधील धांदरपळ येथे झालेल्या सुजय विखे यांच्या एका कार्यक्रमात वसंत देशमुख यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यावर आता भाजपने कारवाईचे आदेश दिले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

“जयश्रीताई थोरात या माझ्या मुलीप्रमाणे आहेत, त्या आमच्या परिवारातील एक घटक आहेत. बाळासाहेब थोरात आणि आमच्यात कितीही राजकीत मतभेद असले तरीही राज्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांशी आमचे पारिवारिक संबंध आहेत. जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल वसंत देशमुखांवर निवडणूक आयोगाने कडक कारवाई केली पाहिजे. पोलिसांनीही त्यांच्यावर कडक कारवाई करत,

जिथे असतील तिथून त्यांना ताब्यात घेतले पाहिजे. कारण, जयश्री थोरात यांचा अपमान हा सहन करण्यासारखा नाही. भाजप पक्ष हा या बाबतीत पूर्णपणे जयश्री थोरात यांच्या पाठीशी उभा आहे.” असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली बाजू मांडली.

पुढे बावनकुळे म्हणाले की, “वादग्रस्त विधान वसंत देशमुखांनी केले. पण या घटनेचा गैरफायदा घेत तिथे काही काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षातील लोकांनी सुजय विखे पाटील यांच्यावर हल्ला केला. सुजय विखे पाटील यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला, आम्ही त्याचाही निषेध करतो. या भ्याड हल्ल्यात जे कोणी दोषी आहेत, त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.” अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, “सुजय विखे पाटील यांचा काही दोष नसताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. व्यासपीठावर वसंत देशमुख यांनी केलेल्या विधानाचे सुजय विखे पाटलांनी त्याचे समर्थन कुठेच केले नाही, त्यांनीदेखील देशमुखांच्या विधानाचा कडक शब्दात निषेध केला आहे. त्यामुळे भाजप वसंत देशमुखांवर कडक कारवाई करण्याच्या भूमिकेत आहे.”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button