Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

हत्या होऊनही आरोपी फरार, पोलिस गप्प! राहाता पोलिसांवर पाठीशी घालण्याचा आरोप-कायद्याचा वचक कुठे?

शिर्डी | प्रतिनिधी
“वेळेवर पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले असते, तर आज माझा भाऊ जिवंत असता!”
हा आक्रोश आहे सचिन स्थानराव गिढे या तरुणाच्या कुटुंबीयांचा, ज्याचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आणि मृतदेह गोदावरी नदीत फेकून देण्यात आला.
या गंभीर प्रकरणात राहाता पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळेच आरोपींचे फावले, असा थेट आरोप आता पीडित कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी मृताचा भाऊ अमोल स्थानराव यांनी सामाजिक नेते मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे कडक शब्दांत निवेदन सादर करून न्यायासाठी हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
🟥 अपहरणाची माहिती असूनही ‘मिसिंग’ची नोंद!
घटना घडताच सचिन गिढे यांच्या पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन
➡️ पतीचे अपहरण झाल्याची स्पष्ट माहिती दिली
➡️ संशयित आरोपींची नावेही सांगितली
मात्र तरीही, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल न करता केवळ ‘मिसिंग’ची नोंद करून गंभीर दुर्लक्ष केले.
या हलगर्जीपणामुळे आरोपींना पुरावे नष्ट करण्यास व हत्या करण्यास वेळ मिळाला, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
🟥 हत्या होऊनही पोलिसांचा संथ तपास
10/12/2025 रोजी सचिन गिढे यांची हत्या झाल्याचे स्पष्ट असतानाही
➡️ 11/12/2025 रोजी उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल
➡️ तपास अपूर्ण असतानाही काही आरोपींना CR-20 अंतर्गत लाभ
➡️ मुख्य आरोपींपैकी प्रवीण नानासाहेब वाघमारे आजतागायत फरार
➡️ तरीही पोलिसांकडून अटक नाही
या साऱ्या बाबींमुळे आरोपींना पाठीशी घालण्याचा गंभीर संशय बळावत आहे.
🟥 “ही हत्या नव्हे, तर यंत्रणेचा खून!”
पीडित कुटुंबीयांचा आरोप आहे की,
ही घटना केवळ एका तरुणाची हत्या नसून
👉 पोलिस यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा बळी
👉 कायद्याच्या अंमलबजावणीतील अपयश
👉 गरीब कुटुंबाच्या न्यायाचा खून
आहे.
🟥 कुटुंबाच्या ठाम मागण्या
पीडित कुटुंबाकडून पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत —
🔴 सर्व आरोपींना तात्काळ अटक
🔴 फरार आरोपी प्रवीण वाघमारे यास त्वरित जेरबंद करणे
🔴 सर्व आरोपींवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई
🔴 अमानुष हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा
🔴 अपहरण असूनही गुन्हा नोंद न करणाऱ्या व तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई
🟥 सवाल जनतेचा : पोलिस कुणाच्या बाजूने?
या प्रकरणामुळे राहाता–शिर्डी परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
“पोलिस वेळेवर काम करत नाहीत, आरोपी मोकाट फिरतात आणि निरपराध मरतो”
असा रोखठोक सवाल आता जनतेकडून विचारला जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button