Letest News
गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद”
राजकीयशिर्डी

अजितदादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राची अपूरणीय हानी-डॉ. राजेंद्र पिपाडा यांची भावपूर्ण श्रद्धांजली

२००३ साली दुष्काळग्रस्त भागाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री असताना अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत निळवंडे कालव्याच्या दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे आयोजन भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केले होते. त्या काळात काही नेत्यांचा या कार्यक्रमाला विरोध असतानाही अजितदादांनी दिलेला शब्द पाळत सकाळी ठीक ८.३० वाजता कार्यक्रमस्थळी हजेरी लावली, अशी आठवण डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी काढली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या दुष्काळी परिषदेसह प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा यांच्या कार्यकाळात राहाता नगरपालिकेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटनही मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. उद्घाटनापुरते मर्यादित न राहता अजितदादांनी प्रत्येक कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. काम योग्य दर्जाचे झाले आहे की नाही, स्वच्छता व निटनेटकेपणा राखला आहे का, याची काटेकोर तपासणी करून आढळणाऱ्या त्रुटी त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडल्या, असे डॉ. पिपाडा यांनी सांगितले.


अजितदादा हे अत्यंत दिलखुलास, परखड आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेते होते. निर्णयक्षमता, वेळेचे काटेकोर नियोजन आणि कामाबाबत कोणतीही तडजोड न करणारी त्यांची कार्यशैली सर्वांसाठी आदर्शवत होती, असेही त्यांनी नमूद केले.
अजितदादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र राज्याची फार मोठी हानी झाली असून, ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. दादांचे कार्य, शिस्त आणि नेतृत्व सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button