Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
अ.नगरराजकीय

जरांगे पाटीलांचं ठरलं! केल्या तीन मोठ्या घोषणा

विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. अंतरवाली-सराटीतील सभेत भाषण करताना त्यांनी तीन महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर महायुतीला मराठवाड्यात महागात पडला होता. आता विधानसभेला जरांगेंनी थेट निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केलेली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी त्यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. ‘पहिला मुद्दा म्हणजे जिथे मराठा उमेदवार निवडून येण्याची पक्की खात्री असेल, तिथे उमेदवार उभा करायचा. दुसरा मुद्दा म्हणजे एससी, एसटीसाठी आरक्षित असलेल्या जागांवर आपण आपले उमेदवार द्यायचे नाहीत. तिकडे जो आपल्या विचाराचा असेल,

त्याला निवडून आणायचा. तिसरा मुद्दा म्हणजे जिथे आपला उमेदवार निवडून येत नसेल तिथे जो उमेदवार आपल्याला ५०० रुपयाच्या बाँडवर आपल्या मागण्यांशी सहमत असल्याचं लिहून देईल त्याला मतदान करायचं, नाहीतर पाडायचं,’ अशा घोषणा जरांगे यांनी केल्या आहेत. एका जातीच्या जोरावर सीट निवडून येत नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा.

मी समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. ते जुळलं नाही तर मग अवघड आहे. तुम्ही अर्ज भरा. कोणाचे अर्ज माघारी घ्यायचे ते आपण नंतर ठरवू. अर्ज माघारी घेतला तर काही नुकसान होत नाही. अनामत रक्कम परत मिळते, असं जरांगे पाटील म्हणाले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button