Letest News
भोंदू अशोक खरातवर शिर्डी पोलिसांचा फास आवळला! कोट्यवधींच्या बनावट खात्यांसह सावकारी-जमीन घोटाळ्याचा ... दोन आरोपी गजाआड- कल्पना खरात अजूनही फरार⚖️ अटकपूर्व जामिनावर सुनावणी- पुढील तारीख 16 एप्रिल मिलिट्री सामानाच्या ट्रकला भीषण आग- पोलिसांवर गंभीर आरोप- परिसरात खळबळ दानशूर उद्योगपती अनंत अंबानी यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा “छेडछाड केल्यास थेट कारवाई!” – ‘शी-बॉक्स’ पोर्टल अधिक कडक मयत दिवटे प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांचा संकेत – फेरतपासाची शक्यता “राहता मटन मार्केटमध्ये संतापजनक प्रकार-मेलेल्या बोकडाचे मटन विक्री- दुकानदारावर कारवाईचा बडगा!” दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्याशी भेट-बजरंगबलीची मूर्ती देऊन सत्कार शिर्डी ते पनवेल … फसवणुकीचा खेळ उघड! 50 हजारांच्या झोपडपट्टीत घुसून शिर्डी पोलिसाने केला आरोपीचा ‘गे... “भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा मोठा स्फोट; SIT च्या पहिल्याच पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे!”
अ.नगरक्राईम

पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात मिळाला

शिर्डी प्रतिनिधी/ अज्ञात गुन्हेगाराने अंदाजे ५ ते ६ वर्षीय मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह पांढऱ्या कापडात गुंडाळून चासनळी गोदावरी नदीत फेकल्याची घटना शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी घडली आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणीपात्रामध्ये दुपारच्या सुमारासं नदीकाठी गेलेल्या काही स्थानिकांना संशयास्पद वस्त्र नदीमध्ये तरंगताना आढळले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

जवळ जाऊन पाहिल्यानंतर पांढऱ्या कापडात गुंडाळलेला मृतदेह असल्याचे समजले. घाबरलेल्या नागरिकांनी तालुका पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेत घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे प्राथमिक तपासात मृत मुलाच्या शरीरावर जखमा सदृश्य निशाण असल्याचे आढळले आहे त्यामुळे सदर बालकाची हत्या कोणी केली? कशासाठी केली?

नरबळीचा प्रकार तर नसेल ना? असे तर्क वितर्क प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहे सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, ज्यातून पुढील तथ्ये उघड होण्याची शक्यता आहे.घटनेची गांभीर्याने दखल घेत शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी भेट देत तपासाचे चक्र वेगाने फिरवले आहे.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, मृताच्या कुटुंबीय व स्थानिक नागरिकांची चौकशी केली जात आहे.ही घटना समजल्यावर परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकांनी या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

या घटनेने पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षिततेबाबत समाजाला अंतर्मुख केले आहे. पालकांनी आपली मुले सुरक्षित असल्याची खात्री करावी, तसेच मुलांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना या प्रकरणात कोणतीही माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button