मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण करणारसंस्थांनने ग्रामस्थ्यांचा अंत पाहू नये
श्री साईबाबा मंदिराचे चारही गेट खुले करणे,चारही गेट जवळ मोबाईल आणि चप्पल स्टँड असावे व चारही गेट जवळ सशुल्क दर्शन पास व्यवस्था व लाडू काऊंटर असावे या मागण्यांसाठी शिर्डी शहर व्यापारी संघटना व शिर्डी ग्रामस्थ यांच्यावतीने साईबाबा संस्थान प्रशासनास भव्य मोर्च्याद्वारे निवेदन देण्यात आले होते..
या मोर्च्याद्वारे सदर मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात साईबाबा संस्थान प्रशासनास १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता..परंतु अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही..शिर्डीकरांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण करण्यास साईबाबा संस्थान प्रशासन पुर्णपणे उदासीन आहे ही बाब यातून प्रकर्षाने दिसून येत असून शिर्डी परिसरामध्ये याबाबत प्रचंड असंतोष पसरलेला आहे..
यामुळे आपल्या मागण्या पूर्ण करण्याच्या हेतूने लवकरच साखळी उपोषणाचे नियोजन करण्यात येणार आहे..याबाबत
प्रशासनास आपल्या मागण्यांची आठवण करून देण्यासाठी सर्वांनी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी साहेब यांची भेट घेण्यासाठी उद्या
शनिवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ११ वाजता मारुती मंदिराजवळ उपस्थित रहावे ही विनंती..
समस्त शिर्डी व्यापारी संघटना व शिर्डी ग्रामस्थ यांनी केली आहे