Letest News
श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं...
क्राईमशिर्डी

ऐन निवडणूक काळात कोयता हातात घेऊन फिरणारे दोन तरुण जेरबंद! शिर्डी पोलिसाची कारवाई !

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टिकोनातून शिर्डी पोलिसांच्या माध्यमातून विविध उपाय योजना करण्यात येत असून त्या अनुषंगाने २८ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी सपोनी भारत बलैया हे शिर्डी शहर परीसरात गस्त घालत असताना पोलीस खबरीने दिलेल्या माहितीनुसार दोन तरुण आंबेडकर नगर शिर्डीत हातात कोयता घेऊन आपली दहशत निर्माण करण्यासाठी मी भाई आहे,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मारून टाकू असे म्हणून कोयता हातात घेऊन आरडाओरड करत असल्याची माहिती मिळताच तात्काळ पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने खाजगी वेशात जाऊन त्या ठिकाणी गोंधळ घालत असलेले व हातात धारदार कोयता असलेले दीपक गोरख वाघ वय २२राहणार ,पानमळा शिर्डी व प्रेम सुधाकर शेजवळ २६ राहणार गणेशवाडी शिर्डी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची नाव गाव चौकशी केली असता

त्यांनी वरील प्रमाणे माहिती दिल्यानंतर या दोघांच्या विरोधात शिर्डी पोलिसांनी शस्त्र अधिनियम१९५९ २५,४ पोलीस अधिनियम १३५ ३७(१) ३७(३) शिर्डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आधिक तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुभांर हे करीत आहे. दरम्यान अहिल्या नगर जिल्ह्यात शिर्डी हे एक आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून येथे पोलीस अधीक्षकांचा धाक राहिला नाही.

राजरोसपणे शिर्डीत गुन्हेगार हत्यार घेऊन निवडणूक काळात दहशत माजवत आहेत. शिर्डीत गुन्हेगारीचे किती जाळेमुळे पसरले आहे हे यावरून दिसते. शिर्डीत गुन्हेगारी वाढत चालली आहे. मात्र त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काहीच उपाययोजना पोलिसांकडून केली जात नसल्याचे नागरिक, साई भक्त बोलत आहेत.

ऐन निवडणूक काळात तरी येथे कायदा व सुव्यवस्था आणि शांतता रहावी यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. असेही बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button