Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप... राहाता नगरपरिषद : “जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना झाडू घेऊन हद्दपार करा!” — रामनाथ सदाफळ (आप) सुनील निवृत्ती पाटील शिंदे यांचा प्रचंड दावा : “प्रभाग २ मध्ये नंदूभाऊंचा विजय ठरलेलाच… विरोधकांची ब... एआय बनावट वन्यप्राणी व्हिडिओवाल्यांना थेट जेल — एसपी सोमनाथ घार्गे यांची कडक सूचना”
अ.नगरक्राईम

शेतकऱ्यांची शेती पाण्यात तरी प्रवरा परिसरात भव्य सोहळा!काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे यांचा विखे परिवारावर अप्रत्यक्ष निशाणा — “सहकार एका कुटुंबाची मालमत्ता नाही!”

काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे यांचा सरकारवर निशाणा

sai nirman
जाहिरात

या कार्यक्रमानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस सौं. प्रभावती घोगरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
त्या म्हणाल्या — “पद्मश्री विठ्ठलरावांचे योगदान नाकारता येणार नाही, पण सहकार हा कोणा एकट्याचा नव्हे. गाडगीळ, वैकुंठबाई मेहता आणि अण्णासाहेब शिंदे यांचे योगदानही तेवढेच महत्त्वाचे आहे.”

DN SPORTS

kamlakar


🏭 “सहकार एका कुटुंबाची मालकी नाही” — घोगरे यांची टीका

घोगरे यांनी विखे परिवारावर अप्रत्यक्ष टीका करत सांगितले की, “आज प्रवरा परिसरात फक्त एका कुटुंबाचे नाव घेतले जाते, मात्र ज्यांनी जमीन, पैसा आणि श्रम अर्पण करून हा कारखाना उभा केला त्यांचा विसर पडलेला आहे.”
त्यांनी पुढे म्हटलं, “सहकारी संस्था ही सर्वांची आहे, पण आता ती व्यक्तिगत मालमत्ता झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.”


🌧️ “शेतकरी बेहाल, तरी भव्य कार्यक्रमांचा खर्च का?”

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडालेली आहे, जमीन वाहून गेली आहे, पिके नष्ट झाली आहेत — अशा अवस्थेत भव्य कार्यक्रमांवर खर्च करणे योग्य नसल्याचं घोगरे यांनी स्पष्ट केलं.
त्या म्हणाल्या, “ओल्या दुष्काळाची घोषणा करणे गरजेचे असताना सरकारने कार्यक्रमांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तो पैसा वापरायला हवा होता.”


🚜 “शेतकरी शेतात; सभेत कर्मचारी वर्ग!”

घोगरे म्हणाल्या, “कार्यक्रमात दिसलेली गर्दी ही शेतकऱ्यांची नव्हती, ती संस्थांच्या कर्मचारी वर्गाची होती. खरे शेतकरी तर सध्या शेतात आहेत — आपले पिक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.”
त्यांनी सभेतील गर्दीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.


🔥 “राजकारणात गणितं बदलतात, पण आमची तत्वं नाहीत”

विखे आणि विवेक कोल्हे यांच्या एकत्र उपस्थितीबाबत विचारले असता घोगरे म्हणाल्या —
“राजकारणात समीकरणं बदलतात, पण आम्ही काँग्रेस कार्यकर्ते म्हणून आमचा लढा तत्त्वनिष्ठ पद्धतीने सुरू ठेवला आहे आणि तो पुढेही सुरू राहील.”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button