Letest News
साईभक्तांच्या चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरलेल्या कबाडींकडे मंदिर सुरक्षा-‘अपयशाला बक्षीस की भाविकांच्या ... शिर्डीत विनापरवाना आम पापड विक्रीचा सुळसुळाट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू? तातडीच्या कारवाईची नाग... जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत महामृत्युंजय राज समता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे-आरोपींच्या अडचणी वाढणार अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री-विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करा- जिल्हा महिला व बाल विकास ... अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणाने राहता हादरले संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक शिर्डीत १५ लाखांचे सोने गायब- वॉटर पार्कमधील घटनेने खळबळ-पोलिसांत अद्याप तक्रार नाही 'लाडू प्रसाद कारखाने सील'च्या कथित खोट्या बातमीवर शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल वाचन संस्कार हरवत चालले-मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीबाबत डांगे सरांची खंत
राजकीयशिर्डी

ShirdiNews #RickshawIssue#शिर्डीत मीटरविना रिक्षांचा हैदोस-साईभक्तांची सर्रास लूट – प्रशासन झोपेत का?

शिर्डी :
राज्यात ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी शासन विविध योजना राबवत असताना साईनगरी शिर्डीत मात्र पूर्णपणे उलट चित्र पाहायला मिळत आहे. येथे शेकडो रिक्षा मीटरशिवायच धावत असून साईभक्तांकडून उघडपणे मनमानी भाडे उकळून त्यांची सर्रास लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. विशेष म्हणजे ही लूट सर्वांसमोर सुरू असतानाही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दररोज हजारो साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येत असतात. रेल्वे स्थानक, बसस्थानक, मंदिर परिसर आणि शहरातील प्रमुख चौकांमध्ये रिक्षाचालकांकडून मीटर न लावता थेट भाविकांशी घासाघीस करून भाडे आकारले जात असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी अवघ्या काही अंतरासाठी 200 ते 500 रुपयांपर्यंत भाडे मागितले जात असल्याच्या तक्रारी भाविकांकडून होत आहेत.
नियमांनुसार प्रत्येक ऑटो रिक्षामध्ये मीटर बसविणे बंधनकारक आहे.

मात्र शिर्डीत अनेक रिक्षांमध्ये मीटरच नसल्याचे उघडपणे दिसत आहे. इतकेच नव्हे तर काही रिक्षा परवाना, नोंदणी किंवा अधिकृत कागदपत्रांशिवायच धावत असल्याचीही चर्चा शहरात आहे. त्यामुळे अधिकृत व नियम पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर अन्याय होत असून त्यांची उपजीविकाही धोक्यात आली आहे.


शिर्डी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील धार्मिक पर्यटन स्थळ असताना अशा प्रकारे भाविकांची लूट सुरू असणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब मानली जात आहे. परिवहन विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्त कारवाई करून मीटरविना धावणाऱ्या तसेच बोगस रिक्षांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


दरम्यान, राज्य शासन रिक्षाचालकांच्या कल्याणासाठी योजना राबवत असताना शिर्डीत मात्र नियमांची उघडपणे पायमल्ली होत असताना प्रशासन का गप्प आहे? असा संतप्त सवाल नागरिक व साईभक्तांकडून उपस्थित केला जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button