Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
अ.नगरराजकीय

अनुकंपा नोकरीमुळे जगण्याला मिळालं बळ ! अनुकंपाधारक उमेदवारांची शासनाप्रती कृतज्ञतेची भावना

अहिल्यानगर, दि. ४ │ शासकीय कर्मचाऱ्यांच्या अकाली निधनामुळे उद्ध्वस्त झालेल्या अनेक कुटुंबांना शासनाच्या अनुकंपा नियुक्ती योजनेमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. शासनाने पारदर्शक व जलद प्रक्रिया राबवून मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र वारसांना गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील पदांवर नोकऱ्या दिल्या.
“अनुकंपा नोकरीमुळे जगण्याला बळ मिळालं,” अशा भावना उमेदवारांनी नियुक्तीपत्र स्वीकारताना व्यक्त केल्या.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🙏 अनुकंपाधारक उमेदवारांची शासनाप्रती कृतज्ञतेची भावना

शासकीय सेवेत नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांनी शासनाबद्दल मन:पूर्वक आभार व्यक्त केले.
“या निर्णयामुळे आमचं आयुष्यच बदललं,” असे सर्वांनी सांगितले. शासनाने तीन वर्षांच्या आतच नियुक्त्या दिल्याने अनेक कुटुंबांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


👨‍🌾 “आईच्या आशा पूर्ण करणार” — कृषीसेवक शिवम झरेकर

अहिल्यानगर येथील शिवम प्रशांत झरेकर यांची कृषी विभागात कृषीसेवक म्हणून नियुक्ती झाली.
“नोकरी मिळाल्याने बहीण श्रेयशीच्या शिक्षणाची आणि लग्नाची जबाबदारी पार पाडता येईल. आईच्या आशा पूर्ण करता येतील,” असे शिवम म्हणाले.
त्यांची आई जयश्री झरेकर म्हणाल्या, “पतीच्या निधनानंतर दुःखाचा डोंगर कोसळला होता, पण आता मनाला दिलासा मिळाला.”


👮‍♂️ भिंगारचा विक्रम केदार — दोन्ही पालक गमावले, पण हिम्मत ठेवली जिवंत

विक्रम विठ्ठल केदार यांची पोलीस विभागात लिपिक म्हणून नियुक्ती झाली आहे.
दोन्ही पालकांचे निधन झाल्यानंतर आजी आणि भावाच्या सोबतीने त्यांनी जीवन जगण्याची लढाई सुरू ठेवली.
“आता शासकीय नोकरीमुळे आजीची सेवा करता येईल,” असे विक्रम म्हणाले.


🚜 गौरव गागरे व जयदेव नन्नावरे यांना स्थैर्याचा नवा मार्ग

राहाता तालुक्यातील जयदेव दीपक नन्नावरे यांची जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
“शासकीय नोकरीमुळे जीवनात स्थैर्य आणि सुरक्षितता मिळेल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

तर गौरव बाळासाहेब गागरे (जामखेड) यांची ग्रामविकास महसूल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.
“आईने शिवणकाम करून कुटुंब सांभाळलं. आता नोकरीमुळे तिची मेहनत कमी होईल,” असे गौरव यांनी सांगितले.


🏛️ शासनाच्या संवेदनशील निर्णयामुळे उजळल्या अनेक घरांच्या दिवट्या

नाशिकचे धनंजय नागेश निकम (कृषी विभाग) यांनी सांगितले,
“बाबा गेल्यानंतर एका वर्षातच नोकरी मिळाली, आता जीवनात स्थैर्य येणार आहे.”
शासनाच्या या निर्णयामुळे अनेक घरांतील कष्ट, चिंता आणि असुरक्षितता संपून आनंद आणि अभिमानाचा प्रकाश पसरला आहे. 🌼

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button