Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरक्राईम

बीड जिल्ह्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातही अवैध धंद्यामुळे वाढली गुन्हेगारी!

शिर्डी ( प्रतिनिधी) बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांप्रमाणेच अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनी कडक निर्णय घेणे महत्त्वाचे असून अवैध धंद्यांच्या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक कधी ॲक्शन मोडवर येणार? असा सवाल जिल्ह्यातील नागरिकांकडून आता होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाल्मिक कराड याला ताब्यात घेतल्यावर त्याच्या समर्थकांनी आंदोलने केली आहेत. बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ वाढल्याचं दिसून आलं आहे. मराठा आणि वंजारी समाज यांच्यात आरक्षणावरून आधीच काही संघर्ष असताना संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे प्रकरण आणखी तापताना दिसत आहे.

अशातच जातीय तेढ वाढू नये यासाठी बीडचे एसपी नवनीत काँवत यांनी कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देत एकप्रकारे इशाराही दिला आहे.पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकारी यांना शिस्त लावण्यासाठी, त्याचबरोबर जातीयवाद नसावा यासाठी, आता प्रयत्न सुरू केले आहेत.

यापुढे अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना हाक मारताना, त्यांच्या आडनावाऐवजी थेट नावाने हाक मारावी. वर्दीवर असताना रील्स काढून सोशल मीडियावर टाकल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे, त्याचबरोबर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप झाला तर ठाणेप्रमुखाची थेट नियंत्रण कक्षात बदली केली जाईल.

अशा सूचना देत थेट इशारा देखील, यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्याप्रमाणेच अहिल्या नगर जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही असे काही धाडसी निर्णय घेतले पाहिजेत. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंदे तेजीत सुरू आहेत. व त्यातूनच गुन्हेगारी वाढत जाते. बीड जिल्ह्याचे वातावरण व तेथील परिस्थिती लक्षात घेता अहिल्यानगर जिल्ह्यातही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कडक धोरण स्वीकारले पाहिजे.

बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कधी ॲक्शन मोडवर येणार असा सवाल आता जिल्ह्यातील नागरिक करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध दारू धंदे मटका जुगार अवैध वेश्या व्यवसाय अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या अवैध धंद्यातून मिळालेल्या पैशावर दादागिरी गुंडगिरी मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे जिल्ह्यातील हे अवैध धंदे कधी बंद होणार जिल्हा पोलीस अधीक्षक कधी ॲक्शन मोडवर येणार असा सवाल जिल्ह्यातील नागरिक करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button