Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
अ.नगरराजकीय

अहमदनगर जिल्ह्यात कडाक्याची थंडी- ‘यलो अलर्ट’ जारी – जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी कायम असून काही भागात तापमान 10 अंश सेल्सियसपेक्षा खाली घसरले आहे. हवामान विभागाने 9 ते 11 डिसेंबर 2025 या कालावधीसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तापमानातील तीव्र घसरण पाहता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकात थंडीमुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत.

sai nirman
जाहिरात

2) नागरिकांनी सावध राहावे; उघड्यावर झोपू नका – प्रशासनाचा इशारा

कडाक्याच्या थंडीत बिनछपराच्या जागेत, मंदिर परिसरात, बसस्थानकांवर, बांधकामांवर किंवा उघड्यावर झोपणे टाळावे, अशी जोरदार सूचना प्रशासनाने केली आहे.
विशेषतः वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी खास काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शरीर उबदार ठेवण्यासाठी जाड कपडे, टोपी, मफलर, हातमोजे, गरम पाण्याचा वापर करण्याची सूचना देण्यात आली आहे.

DN SPORTS

3) हायपोथर्मियाची लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार घ्या – डॉक्टरांचे आवाहन

थंडीमुळे शरीराचे तापमान अत्यंत कमी झाल्यास हायपोथर्मियाचा धोका निर्माण होतो. त्वचेचा रंग निळसर पडणे, जास्त कंप सुटणे, बोलण्यास त्रास होणे, हातापायात सुन्नपणा किंवा थकवा – अशी लक्षणे दिसल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उशीर झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, त्यामुळे कोणतीही लक्षणे दिसली तर त्वरित जवळच्या रुग्णालयात संपर्क साधावा, अशी विनंती केली आहे.


4) पशुधनासाठी संरक्षण आवश्यक; जनावरांना थंडीपासून सुरक्षित ठेवा

नागरिकांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी, त्यांना गोठ्यात किंवा हवाबंद ठिकाणी ठेवावे, अशी सूचना देण्यात आली आहे. अत्यंत थंडीच्या रात्री जनावरांना उकाड्याची व्यवस्था, गवत, पेंढा किंवा आच्छादन देणे आवश्यक आहे.
जनावरांच्या आरोग्यासंबंधी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी ‘१०८’ हा टोल-फ्री क्रमांक त्वरित डायल करून मदत मागावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button