Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरक्राईम

वसंत देशमुख जिथे असतील त्यांना ताब्यात घ्या निवडणूक आयोगाने ही कडक कारवाई करावी चंद्रशेखर बावनकुळे

भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून जी काही कडक कारवाई वसंत देशमुख याच्यावर झाली पाहिजे, ती आम्ही करू.” असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संगमनेरमधील धांदरपळ येथे झालेल्या सुजय विखे यांच्या एका कार्यक्रमात वसंत देशमुख यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यावर आता भाजपने कारवाईचे आदेश दिले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

“जयश्रीताई थोरात या माझ्या मुलीप्रमाणे आहेत, त्या आमच्या परिवारातील एक घटक आहेत. बाळासाहेब थोरात आणि आमच्यात कितीही राजकीत मतभेद असले तरीही राज्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांशी आमचे पारिवारिक संबंध आहेत. जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल वसंत देशमुखांवर निवडणूक आयोगाने कडक कारवाई केली पाहिजे. पोलिसांनीही त्यांच्यावर कडक कारवाई करत,

जिथे असतील तिथून त्यांना ताब्यात घेतले पाहिजे. कारण, जयश्री थोरात यांचा अपमान हा सहन करण्यासारखा नाही. भाजप पक्ष हा या बाबतीत पूर्णपणे जयश्री थोरात यांच्या पाठीशी उभा आहे.” असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली बाजू मांडली.

पुढे बावनकुळे म्हणाले की, “वादग्रस्त विधान वसंत देशमुखांनी केले. पण या घटनेचा गैरफायदा घेत तिथे काही काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षातील लोकांनी सुजय विखे पाटील यांच्यावर हल्ला केला. सुजय विखे पाटील यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला, आम्ही त्याचाही निषेध करतो. या भ्याड हल्ल्यात जे कोणी दोषी आहेत, त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.” अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, “सुजय विखे पाटील यांचा काही दोष नसताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. व्यासपीठावर वसंत देशमुख यांनी केलेल्या विधानाचे सुजय विखे पाटलांनी त्याचे समर्थन कुठेच केले नाही, त्यांनीदेखील देशमुखांच्या विधानाचा कडक शब्दात निषेध केला आहे. त्यामुळे भाजप वसंत देशमुखांवर कडक कारवाई करण्याच्या भूमिकेत आहे.”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button