Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
राजकीयशिर्डी

चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना साकडे

शिर्डी | प्रतिनिधी :
देशाच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर जगभरातून लाखो भाविक साईंच्या चरणी माथा टेकण्यासाठी शिर्डीत येतात. डोळ्यांत श्रद्धा, मनात साईंचे नाम आणि हृदयात दर्शनाची आस घेऊन हे भक्त समाधी मंदिरात पोहोचतात. मात्र दर्शन घेतल्यानंतर चावडी, द्वारकामाई आणि मुख्य दर्शन मार्गाकडे जाण्यासाठी स्पष्ट दिशादर्शक फलक नसल्याने अनेक भाविकांना वाट शोधण्यासाठी इतरांना विचारावे लागत आहे.
शिर्डीसारख्या जागतिक तीर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी आता साईभक्त संतोष कोते यांनी श्री साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


‘साईंच्या भक्ताला मार्ग विचारण्याची वेळ येऊ नये’
समाधी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविकांना चावडी मंदिर, द्वारकामाई अथवा मुख्य दर्शन मार्ग नेमका कोणत्या दिशेने आहे, याची माहिती नसते. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि परराज्यातून येणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय होते.
काही भाविक मंदिर परिसरात इकडे-तिकडे फिरताना दिसतात, तर काहींना वारंवार कर्मचारी किंवा इतर भाविकांकडे मार्ग विचारावा लागतो. साईंच्या दारी आलेल्या भक्ताला पुन्हा मार्गदर्शनासाठी कोणाला शोधण्याची वेळ येणे, ही बाब निश्चितच संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे.


कार्यकारी अधिकाऱ्यांकडे भाविकांच्या हितासाठी साकडे
संतोष कोते यांनी संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून मागणी केली आहे की, समाधी मंदिर परिसराच्या सर्व बाजूंना आणि प्रमुख ठिकाणी मोठे, स्पष्ट व सहज दिसणारे दिशादर्शक फलक तातडीने लावण्यात यावेत.
या फलकांवर ‘चावडी’, ‘द्वारकामाई’, ‘मुख्य दर्शन’, ‘प्रसादालय’, ‘पिण्याचे पाणी’, ‘बाहेर जाण्याचा मार्ग’ आदी ठिकाणांची माहिती देण्यात यावी. तसेच मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी भाषेत फलक लावल्यास देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना मोठा फायदा होईल.


‘छोटी सुविधा, पण लाखो भक्तांसाठी मोठा दिलासा’
भाविकांची सोय करण्यासाठी संस्थानकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र दिशादर्शक फलक ही साधी वाटणारी सुविधा असून तिचा थेट लाभ दररोज हजारो भाविकांना मिळू शकतो.
“साईंच्या नगरीत येणारा प्रत्येक भक्त हा आपला पाहुणा आहे. त्याला मंदिर परिसरात कुठे जायचे, कोणत्या दिशेने जायचे यासाठी कोणाकडे विचारण्याची गरज पडू नये. स्पष्ट दिशादर्शक फलक लावून भाविकांची ही छोटीशी अडचण दूर करावी,” अशी भावनिक मागणी संतोष कोते यांनी केली आहे.


संस्थान प्रशासन काय निर्णय घेणार?
भाविकांच्या दैनंदिन गैरसोयीचा प्रश्न लक्षात घेऊन संस्थानचे कार्यकारी अधिकारी याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेतील आणि मंदिर परिसरात दिशादर्शक फलकांची व्यवस्था करतील, अशी अपेक्षा साईभक्तांकडून व्यक्त होत आहे.
साईंच्या दारी आलेल्या भक्ताला साईंच्या मंदिरात वाट चुकू नये…
हीच एका साईभक्ताची संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मनापासून केलेली विनंती आहे!

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button