Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरशिर्डी

विरोधक हतबल झालेत — निवडणूक आयोगावर मोर्चे म्हणजे अपयशाचं झाकपाक : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिर्डी प्रतिनिधी | साई दर्शन न्यूज

sai nirman
जाहिरात

शिर्डी – राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
“निवडणूक आयोगाविरोधात मोर्चे काढणं म्हणजे विरोधकांच्या हतबलतेचं द्योतक आहे. त्यांना आधीच दिसतंय की आगामी निवडणुकीत त्यांचं अपयश ठरलेलं आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

DN SPORTS

kamlakar

मंत्री भोसले म्हणाले, “महाविकास आघाडीनं कितीही जुळवाजुळव केली तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास उरलेला नाही. लोकसभेत त्यांना यश मिळालं, पण विधानसभेत ते साफ अपयशी ठरले. त्यातून अजून ते सावरलेले नाहीत.”

राज ठाकरे यांच्या नमो सेंटरवरील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भोसले म्हणाले, “छत्रपतींचा विषय काढल्याशिवाय काही लोकांना निवडणुकीत मुद्देच मिळत नाहीत. नमो सेंटरवर बोलण्याआधी ते काय आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे, हे जाणून घ्यावं. विरोध फक्त विरोधासाठी करू नये.”

पूरग्रस्त भागातील स्थितीवर बोलताना त्यांनी सांगितलं, “सरकारनं शेतकऱ्यांना उदारहस्ते मदत केली. त्यामुळे विरोधकांना तो मुद्दा गेला. आता ते भावनिक मुद्द्यांवर लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.”

महाविकास आघाडीच्या मोर्चाबाबत ते म्हणाले, “आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण आरोप करताना तथ्यांवर बोललं पाहिजे. ईव्हीएम आणि मतदार याद्या यावर बिनबुडाचे आरोप करून स्वतःचं अपयश दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत.”

भोसले यांनी स्पष्ट केलं की, “महायुती सरकार राज्यातील विकास, पूरग्रस्त मदत आणि नागरिकांच्या हिताच्या कामांवर लक्ष केंद्रित करत आहे. जनतेचा विश्वास आमच्यावर आहे.”

शेवटी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि श्री साईबाबा संस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. साईबाबांच्या कृपाशिर्वादाने महाराष्ट्र शांतता, विकास आणि एकतेच्या मार्गावर पुढे जाईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


साईंच्या चरणी नतमस्तक — श्री साईबाबा संस्थानकडून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार 🌸

शिर्डीत आगमनानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन राज्यातील जनतेसाठी साईबाबांच्या आशीर्वादाची प्रार्थना केली.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ तर्फे त्यांचा शाल, श्रीफळ आणि साईचरित्र पुस्तक देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या वेळी संस्थानचे अधिकारी, विश्वस्त आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
भोसले यांनी साईबाबांच्या पवित्र भूमीतून राज्यातील शांतता, विकास आणि जनकल्याणासाठी साईबाबांचे आशीर्वाद मागितले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button