आळंदीला जाणाऱ्या दिंडीत मृत्यूमुखी पडलेल्या वारकऱ्यांनासाईसंस्थानने मदतीचा हात द्यावा-भारतीय लहुजी सेना
(प्रतिनिधी)- शिर्डी ते आळंदी दिंडी सोहळ्यातील
वारकरी भक्तिमय वातावरणात प्रवास करत असताना रविवारी
या पालखीला संगमनेर तालुक्यातील माऊली घाटाजवळ
अपघात झाला. या अपघातात चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला
तर काही वारकरी जखमी झाले. या मयत झालेल्या वारकऱ्यांना
साईबाबा संस्थानने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भारतीय
लहुजी सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

महंत काशिकानंद
महाराज, शिर्डी ग्रामस्थ व साईबाबा संस्थानने या पालखीचा
साई पालखी सोहळा असे नामकरण केलेले आहे. महंत
काशिकानंद महाराज यांच्या प्रेरणेतून अनेक वर्षांपासून धार्मिक
ठिकाणी हजारो वारकऱ्यांना बरोबर घेऊन या पालखीतील
वारकरी भाविक धार्मिक दर्शनाचा लाभ घेतात. मात्र अचानक
या पालखीचा अपघात होऊन चार वारकऱ्यांना आपला जीव
गमवावा लागला. त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले असून
त्या कुटुंबाला शासकीय मदत मिळेलच यात काही शंका नाही
मात्र सदर कुटुंबाला व जखमी झालेल्या कुटुंबातील वारकऱ्यांना
साईबाबा संस्थान त्रिसदस्यीय समितीने मदतीचा हात पुढे
करावा, अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष
मंजाबापू साळवे यांनी साईबाबा संस्थानकडे केली आहे. या
निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव
हनिफ पठाण, राज्य कार्याध्यक्ष समीर वीर, सुरेश अडागळे,
दगडू साळवे, संतोष भडकवाड, नंदू आरणे, सोपानराव पगारे,
भाऊसाहेब आव्हाड, राष्ट्रीय सरचिटणीस रामभाऊ पिंगळे आदी
पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.