

शिर्डी प्रतिनिधी/ साईबाबा संस्थान लगतच्या साईबाबा सुपर हाॅस्पिटल ते पानमळा या रोडवर असलेल्या १२ नंबर चारीवर व रोडलगत असलेले अतिक्रमण शिर्डी नगर परिषद व जलसंपदा विभागाच्या अतिक्रमण विभागाने काढले असले तरी पानमळा ते करडोबा नगर रस्त्यावर अजुन काहीनी वाॅल कंपाऊंड पत्र्याच्या टपरी काहीनी बगल्यात घरात जाण्यासाठी कच्चे पक्के पुल देखील चारीलगत रोड लगतच बांधले असुन
ती अतिक्रमणे देखील जलसंपदा व शिर्डी नगर परिषद कधी काढणार असा सवाल नगरसेवक सुरेश आरणे यांनी विचारला आहे त्यामुळे सरसकट कारवाई करताना भेदभाव करु नये अशी मागणी एका पत्रकाद्वारे केली आहे
शिर्डी लगतच्या १२ नंबर चारीवर असलेले गोरगरीब लोकाचे अतिक्रमणे नुकतीच जमीनदोस्त करण्यात आली आहे शासकीय जमिनीवर अतिक्रमण आहे अशा कारणावरून हि कारवाई करण्यात आली मात्र ती करताना दुजाभाव केला जात असल्याचा त्याचा आरोप
असुन पानमळा ते करडोबा नगर या १२ नंबर चारीवर अजुनही आतिक्रमणे तशीच दिसून येत असुन हाॅस्पिटल ते चिकु बागे पर्यंत आतिक्रमणे जशी काढण्यात आली तशी पुढील असलेल्या लोकाचे अतिक्रमणे देखील काढण्यासाठी जलसंपदा विभाग व शिर्डी नगरपालिकेच्या आधिकारी यांनी धाडस दाखवण्याची गरज असल्याचे त्यांनी मागणी केली आहे