Letest News
श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं...
Blogराजकीयशिर्डी

वडिलांची प्रकृती गंभीर तरी १५०० भाविकांची जबाबदारी खांद्यावर!

विजयराव कोते यांचा संघर्ष प्रेरणादायी

शिर्डी : साई निर्माण ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य १२ ज्योतिर्लिंग यात्रा १५०० भाविकांसह नेपाळमध्ये दिमाखात दाखल झाली आहे. भारत-नेपाळ सीमेवर यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले असून, आज दि. ३ सप्टेंबर रोजी सर्व भाविक प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन घेणार आहेत. मात्र, या भव्य यात्रेमागे साई निर्माण ग्रुपचे प्रमुख विजयराव कोते यांचा संघर्ष आणि त्यागाची कहाणी भाविकांच्या मनाला स्पर्शून जाणारी ठरली आहे.
यात्रेचा प्रवास सुरू असतानाच विजयराव कोते यांचे वडील तुळशीराम कोते यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने इटारसी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका बाजूला वडिलांची गंभीर प्रकृती आणि दुसऱ्या बाजूला तब्बल १५०० भाविकांच्या यात्रेची जबाबदारी, अशा अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना विजयराव कोते यांच्यासमोर उभा राहिला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


वडील की यात्रा? असा भावनिक आणि कठीण प्रसंग निर्माण झाला असतानाही त्यांनी प्रथम वडिलांची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. काही सहकाऱ्यांसह इटारसी येथे थांबून त्यांनी वडिलांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले. मात्र, स्वतः उपस्थित नसतानाही यात्रेच्या नियोजनात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी ते सहकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहिले.
वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच विजयराव कोते यांनी क्षणाचाही विलंब न करता पुन्हा यात्रेकडे धाव घेतली. उत्तर प्रदेशातील नौतनवा रेल्वे स्टेशन गाठल्यानंतर तेथून थेट भारत-नेपाळ सीमा गाठून त्यांनी यात्रेत पुन्हा सहभाग घेतला.
आराम करण्याची वेळ नव्हती, स्वतःच्या अडचणींवर विचार करण्याचीही संधी नव्हती; हजारो किलोमीटरचा प्रवास करून ते पुन्हा १५०० भाविकांच्या सेवेत दाखल झाले.


या संपूर्ण प्रसंगातून विजयराव कोते यांची जिद्द, कर्तव्यनिष्ठा, संकटसमयी निर्णयक्षमता आणि भाविकांप्रती असलेली बांधिलकी प्रकर्षाने दिसून आली. कौटुंबिक संकट असतानाही यात्रेची जबाबदारी खंडित होऊ न देणे आणि वडिलांची प्रकृती सुधारताच पुन्हा भाविकांमध्ये सहभागी होणे, हा त्यांचा संघर्ष भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
दरम्यान, दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता यात्रा भारत-नेपाळ सीमेवर पोहोचली. बॉर्डरजवळील हॉटेल मानसरोवर येथे भव्य आरतीचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे १५०० भाविकांनी मोठ्या उत्साहाने आरतीमध्ये सहभाग घेतला. भक्तिमय वातावरणात आरती झाल्यानंतर यात्रेचा ताफा काठमांडूकडे रवाना झाला.


आज पशुपतिनाथाच्या चरणी १५०० भाविक नतमस्तक होणार असून, या यात्रेच्या यशामागे विजयराव कोते यांच्या संघर्षाची आणि समर्पणाची कहाणीही तितकीच भावनिक ठरत आहे.
“संकट कितीही मोठे असो, जबाबदारीपासून पळायचे नाही” — विजयराव कोते यांच्या कृतीतून संदेश
वडिलांच्या प्रकृतीची चिंता मनात असतानाही यात्रेतील भाविकांची काळजी आणि नियोजनाची जबाबदारी त्यांनी सोडली नाही. स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून इतरांच्या श्रद्धेच्या प्रवासाला साथ देण्याची त्यांची भूमिका भाविकांकडून विशेष कौतुकास पात्र ठरत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button