Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
राजकीयशिर्डी

अजितदादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राची अपूरणीय हानी-डॉ. राजेंद्र पिपाडा यांची भावपूर्ण श्रद्धांजली

२००३ साली दुष्काळग्रस्त भागाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री असताना अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत निळवंडे कालव्याच्या दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे आयोजन भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केले होते. त्या काळात काही नेत्यांचा या कार्यक्रमाला विरोध असतानाही अजितदादांनी दिलेला शब्द पाळत सकाळी ठीक ८.३० वाजता कार्यक्रमस्थळी हजेरी लावली, अशी आठवण डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी काढली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या दुष्काळी परिषदेसह प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा यांच्या कार्यकाळात राहाता नगरपालिकेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटनही मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. उद्घाटनापुरते मर्यादित न राहता अजितदादांनी प्रत्येक कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. काम योग्य दर्जाचे झाले आहे की नाही, स्वच्छता व निटनेटकेपणा राखला आहे का, याची काटेकोर तपासणी करून आढळणाऱ्या त्रुटी त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडल्या, असे डॉ. पिपाडा यांनी सांगितले.


अजितदादा हे अत्यंत दिलखुलास, परखड आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेते होते. निर्णयक्षमता, वेळेचे काटेकोर नियोजन आणि कामाबाबत कोणतीही तडजोड न करणारी त्यांची कार्यशैली सर्वांसाठी आदर्शवत होती, असेही त्यांनी नमूद केले.
अजितदादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र राज्याची फार मोठी हानी झाली असून, ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. दादांचे कार्य, शिस्त आणि नेतृत्व सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button