Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
अ.नगरशिर्डी

शिर्डीतील ग्रामदैवते यांच्याबरोबरच हाजी अब्दुल बाबा यांची झोपडीहि  ग्रामस्थांकडे किंवा संस्थानं कडे वर्ग करण्यात यावीत

शिर्डी ( प्रतिनिधी)
शिर्डी शहरातील ग्रामदैवत असणारी सर्व मंदिरे यांच्याबरोबरच हाजी अब्दुल बाबांची झोपडी  ग्रामस्थांकडे किंवा श्री साईबाबा संस्थान कडे वर्ग करण्यात यावेत अशी मागणी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान शिर्डीचे कार्याध्यक्ष समीर रामचंद्र वीर यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिर्डी येथे 10 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रामसभा संपन्न झाली. त्यामध्ये शिर्डी शहरातील ग्रामदैवत असणारी श्री गणपती मंदिर, श्री शनि महाराज मंदिर, श्री महादेव मंदिर, श्री हनुमान मंदिर आदी मंदिरे साई संस्थान कडे सध्या देखभालीसाठी असून ती पुरवत साई संस्थानाने ग्रामस्थांकडे वर्ग करावीत.

असा ठराव होऊन साई संस्थान कडे ग्रामस्थांच्या वतीने तशी मागणी करण्यात आली आहे. मात्र शिर्डीत हाजी अब्दुल बाबा यांची झोपडी असून त्यांची देखभाल खाजगी व्यक्ती करून तेथे मिळणारा देणगीरुपी निधी स्वतःसाठी वापरतात. त्यामुळे शिर्डी शहरातील  हि हाजी अब्दुल बाबा यांची झोपडी  ग्रामस्थांकडे किंवा श्री साईबाबा संस्थानकडे वर्ग करण्यात यावीत.

अशी समीर वीर यांची मागणी असून त्यासाठी राहाता तालुक्याचे आमदार नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखे यांनी  विशेष लक्ष घालावे .अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री, व विधी आणि न्याय मंत्री यांना पाठवण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button