Letest News
ड्रग्स स्फोटाने राजकारण पेटलं-सुजय विखेंचं पोलिसांना अल्टिमेटम “गुंड दीपक पोकळेच्या कार्यालयाचे उद्घ... “शिर्डीत पोलिसांचा रौद्रावतार-वेश्या व्यवसाय करणार्‍या गुन्हेगारांवर कायद्याची वज्रकाठी पीटा अंतर्गत... सिंहस्थ कुंभमेळा : शिर्डीच्या विकासाला सुवर्णसंधी कुंभमेळ्याच्या निमित्ताने शिर्डीत विकासाचा महायज्ञ झाडू ते चेअरमन – संघर्षाला सन्मान देणाऱ्या नेतृत्वाला ‘दैनिक साईदर्शन’ कडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक श... नशेच्या इंजेक्शन विक्रीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेचा छापा ११-६१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त-एकास अट... अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर मोक्का-म्पीडीएचा बडगा संगमनेर दौऱ्यात डॉ. पंकज आशियांचे कडक आदेश अखेरचा भगवा सलाम! शिर्डी शहर शिवसेनेचा निष्ठावंत शिलेदार सुनीलभाऊ परदेशी यांचे निधन टाटा मोटर्सचा उदार हात! २५.६९ लाख रुपयांची टाटा सिएरा श्री साईबाबा संस्थानकडे सुपूर्द शिर्डी पोलीस स्टेशनने ‘दैनिक साई दर्शन’च्या बातमीची घेतली दखल सुगंधित तंबाखू विक्रीप्रकरणी छापा- ४-९... भाच्यानेच केला मामाचा खून! स्थानिक गुन्हे शाखेची 15 दिवसांच्या तपासानंतर उकल
अ.नगर

आकाशवाणीचे सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरू

अहमदनगर दि. 8 ऑगस्ट:- गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे सायंकालीन प्रसारण 15 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. आकाशवाणी महानिर्देशनालय दिल्ली आणि अपर महानिर्देशनालय मुंबई यांनी नुकतीच यासाठी परवानगी दिल्याची माहिती आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम विभागप्रमुख राजेन्द्र दासरी यांनी दिली आहे.

sai nirman
जाहिरात
        आकाशवाणी अहमदनगर केंद्राची स्थापना 14 एप्रिल 1991 मध्ये झाली असून, तेव्हापासून विविध कार्यक्रमांद्वारे या केंद्राने श्रोत्यांचे मनोरंजन केले आहे. श्रोत्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या या केंद्राचे सायंकालीन प्रसारण बंद झाल्यामुळे स्थानिक कलाकार आणि श्रोते नाराज होते. तसेच सायंकालीन प्रसारणात स्थानिक कार्यक्रमाऐवजी मुंबई विविधभारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होत होते. त्यामुळे स्थानिक कलाकार, विचारवंत, तसेच आकाशवाणीचे नैमित्तिक उद्घोषक यांना मिळणार्‍या संधी कमी झाल्या होत्या. आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम विभागप्रमुख राजेन्द्र दासरी यांनी वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे सायंकालीन प्रसारणास मंजूरी मिळाली असून 15 ऑगस्ट 2024 पासून पूर्वीप्रमाणेच प्रसारण पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे आता अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील श्रोत्यांना लोकसंगीत, नारीशक्ती, चला करूया पर्यटन, कौटुंबिक श्रुतिका-विचारमंथन, लोकजागर, व्यक्तीवेध, आपली आवड आपकी पसंद, ओळख कायद्याची, हॅलो गीतबहार, सुहाना सफर, रजनीगंधा, हॅलो डॉक्टर, युवावाणी किसानवाणी, आमचं शेत आमचा परिसर, शास्त्रीय संगीत इत्यादी लोकप्रिय कार्यक्रमांची मेजवाणी श्रोत्यांना मिळणार आहे.

        आकाशवाणी अहमदनगर केंद्राच्या वतीने सायंकालीन स्थानिक प्रसारण सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला होता. त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर यश मिळालं असून, 15 ऑगस्ट 2024 पासून आकाशवाणी अहमदनगर केंद्रावरील सायंकालीन स्थानिक प्रसारण पुन्हा सुरू होणार आहे, यामुळे स्थानिक कलाकारांना संधी मिळण्यास मदत होणार असल्याची माहितीही विभागप्रमुख राजेन्द्र दासरी यांनी यावेळी दिली आहे.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button