Letest News
शिर्डीजवळील रिंगरोडवर बाभळीच्या झाडाला गळफास-बुलढाण्यातील ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या-परिसरात खळबळ साईभक्ताच्या प्रामाणिकपणाला सलाम! १५४१० ची हरवलेली पर्स मालकाला सुखरूप परत रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिसांची मोठी कामगिरी चेन स्नॅचिंग टोळ्या जेरबंद "तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?"रोहित पवारांचा सरकारवर हल्... जबलपूरच्या साईभक्ताकडून ६.२८ लाखांचा सुवर्ण मुकुट तर वडोदऱ्याच्या भक्ताकडून ३.३४ लाखांचे सुवर्ण 'ॐ' ... गुरुपौर्णिमा उत्सवाची भक्तिमय सुरुवात; समाधी मंदिरात पाद्यपूजा-श्रींची प्रतिमा-पोथी व विणाची भव्य मि... आरोपी करू नका-अटक टाळतो- पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा साकुरीतील जुगार अड्ड्यावर राहाता पोलिसांची धाड ९ जणांवर गुन्हा ४५-५० जण उपस्थित असल्याची चर्चा शिर्डीत दिवसाढवळ्या धर्मशाळेची भिंत जमीनदोस्त शिवसेना पदाधिकाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई
अ.नगरक्राईम

“तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?”रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई | प्रतिनिधी
तलाठी भरती (२०२३) प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?” असा सवाल करत त्यांनी सरकारची भूमिका धारेवर धरली.
रोहित पवार यांनी तलाठी भरती प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली पाहिजे, अशीही त्यांनी भूमिका मांडली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून विरोधकांनी सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. तलाठी भरती प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील किंवा राज्य सरकारची अधिकृत सविस्तर प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या आरोपांवर सरकार काय भूमिका घेते, याकडे राज्यभरातील उमेदवार आणि जनतेचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button