
शिर्डीतील नवीन पिपळवाडी रोड परिसरात असलेल्या मुंबई बिर्याणी दुकानात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ग्राहकाने पार्सल आणलेल्या बिर्याणीत चक्क गुटख्याची पुडी आढळल्याने खळबळ उडाली. हा प्रकार पाहून ग्राहक हादरला असून हॉटेल मालकाला जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देत पळ काढल्याचा आरोप आहे.
🤢 स्वयंपाकघरात घाणीचं साम्राज्य – झुरळं, आळ्या आणि दुर्गंधी!
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी हॉटेलच्या किचनची पाहणी केली असता अंगावर काटा आणणारे दृश्य समोर आले. बिर्याणीच्या भांड्यात तारेच्या घासणीचे तुकडे, कचऱ्याजवळ ठेवलेलं चिकन, फुटलेल्या फरशीत साचलेलं पाणी आणि त्यात आळ्या, सर्वत्र झुरळांची वर्दळ – अशा अस्वच्छतेत अन्न तयार होत असल्याचं उघड झालं.
⚠️ बिनापरवाना धंदा? अन्न सुरक्षा नियमांची उघडपणे पायमल्ली
संबंधित दुकान बिनापरवाना चालत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्याची मागणी जोर धरतेय. “अशा ठिकाणी लोकांच्या जीवाशी खेळ चाललाय” असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.
😡 “मुख्याधिकारी झोपलेत का?” – हॉटेल सील करण्याची जोरदार मागणी
या प्रकरणानंतर शिर्डी नगरपरिषदेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “अंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत असून, तात्काळ कारवाई करून हे हॉटेल सील करावे, संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
🛑 मोठा सवाल – मुख्याधिकारी कारवाई करतील का?
शिर्डीकरांचा आता थेट प्रश्न – “या जीवघेण्या प्रकारावर मुख्याधिकारी ठोस कारवाई करून हॉटेल सील करणार का, की पुन्हा दुर्लक्षच?”
👉 प्रशासनाच्या पुढील पावलाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे!अन्न भेसळ तपासणी खाते फक्त खाण्यासाठीच आहे का?”
शिर्डीत उघड झालेल्या घाणेरड्या प्रकारानंतर सर्वसामान्य नागरिकांचा संतप्त सवाल समोर येतोय—अन्न भेसळ रोखण्यासाठी असलेलं प्रशासन नेमकं काम करतंय की फक्त नावालाच आहे? नियमांचे उल्लंघन, अस्वच्छता आणि थेट आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेलांवर कारवाई का होत नाही?
👉 नियम आहेत, पण अंमलबजावणी कुठे?
👉 तक्रारी होतात, पण कारवाई का दिसत नाही?
👉 अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवली जाणार का?
⚠️ नागरिकांची स्पष्ट मागणी – “अन्न भेसळ करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा हे प्रकार वाढतच राहतील!”



