Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
राजकीयशिर्डी

थकीत वीजबिलावर ५०% सवलत द्या- डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

शिर्डी : राज्यातील शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शेतीमालाचे अस्थिर दर, वाढता उत्पादन खर्च आणि वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी थकीत शेतीपंप वीजबिलावरील व्याज माफ करावे तसेच पूर्वीप्रमाणे ५० टक्के सवलत लागू करावी, अशी मागणी भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


डॉ. पिपाडा यांनी राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या अडचणींचा सविस्तर आढावा मांडला. अनेक शेतकऱ्यांकडे वीजबिलांची मोठी थकबाकी आहे. मात्र, प्रलंबित वीजबिलावरील व्याज माफ केल्यास शेतकरी मूळ रक्कम भरण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे शासनालाही महसूल मिळेल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

kamlakar


यापूर्वी शासनाने राबविलेल्या वीजबिल माफी योजनेत ५० टक्के सवलत आणि संपूर्ण व्याज माफी देण्यात आली होती. त्या निर्णयाला शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर पुन्हा निर्णय घेतल्यास मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसुली होण्याची शक्यता असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिर्डी विमानतळावर झालेल्या भेटीदरम्यान डॉ. पिपाडा यांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. आता शासन यावर काय भूमिका घेते, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button