Letest News
72 तास उलटले… तरी गुन्हा नाही! शिर्डीत धर्मांतर प्रकरण गूढच” “हिंदुत्ववादी संघटना शांत का? शिर्डीत स... दैनिक साई दर्शनचा दणका! ‘मुंबई बिर्याणी’वर कारवाई – हॉटेल सील घरकुल मंजुरीसाठी लाच मागणाऱ्यांवर सापळा- १० हजार घेताना रंगेहात अटक! अनुयायांच्या नावावर बनावट खाती-‘समता पतसंस्था’चा महाघोटाळा उघडकीस? “समता”ला संरक्षण कोण देतंय? शिर्डीत मानपानाच्या नावाखाली नवविवाहितेचा छळ- पतीसह सहा जणांवर गुन्हा! शिर्डीत वैद्यकीय चमत्कार! 15 किलोची प्रचंड गाठ यशस्वीरीत्या काढली थकीत वीजबिलावर ५०% सवलत द्या- डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाचा धडाका- १५५ प्रकरणांत हस्तक्षेप-वर्षभरात ७ गुन्हे दाखल-अनेक विव... शेळके दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू- हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार सिन्नरचा दीपक लोंढे पोलिसांच्या रडारवर- २५ मालमत्तांची माहिती समोर!
राजकीयशिर्डी

थकीत वीजबिलावर ५०% सवलत द्या- डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

शिर्डी : राज्यातील शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शेतीमालाचे अस्थिर दर, वाढता उत्पादन खर्च आणि वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी थकीत शेतीपंप वीजबिलावरील व्याज माफ करावे तसेच पूर्वीप्रमाणे ५० टक्के सवलत लागू करावी, अशी मागणी भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


डॉ. पिपाडा यांनी राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या अडचणींचा सविस्तर आढावा मांडला. अनेक शेतकऱ्यांकडे वीजबिलांची मोठी थकबाकी आहे. मात्र, प्रलंबित वीजबिलावरील व्याज माफ केल्यास शेतकरी मूळ रक्कम भरण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे शासनालाही महसूल मिळेल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

kamlakar


यापूर्वी शासनाने राबविलेल्या वीजबिल माफी योजनेत ५० टक्के सवलत आणि संपूर्ण व्याज माफी देण्यात आली होती. त्या निर्णयाला शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर पुन्हा निर्णय घेतल्यास मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसुली होण्याची शक्यता असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिर्डी विमानतळावर झालेल्या भेटीदरम्यान डॉ. पिपाडा यांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. आता शासन यावर काय भूमिका घेते, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button