Letest News
ड्रग्स स्फोटाने राजकारण पेटलं-सुजय विखेंचं पोलिसांना अल्टिमेटम “गुंड दीपक पोकळेच्या कार्यालयाचे उद्घ... “शिर्डीत पोलिसांचा रौद्रावतार-वेश्या व्यवसाय करणार्‍या गुन्हेगारांवर कायद्याची वज्रकाठी पीटा अंतर्गत... सिंहस्थ कुंभमेळा : शिर्डीच्या विकासाला सुवर्णसंधी कुंभमेळ्याच्या निमित्ताने शिर्डीत विकासाचा महायज्ञ झाडू ते चेअरमन – संघर्षाला सन्मान देणाऱ्या नेतृत्वाला ‘दैनिक साईदर्शन’ कडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक श... नशेच्या इंजेक्शन विक्रीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेचा छापा ११-६१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त-एकास अट... अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर मोक्का-म्पीडीएचा बडगा संगमनेर दौऱ्यात डॉ. पंकज आशियांचे कडक आदेश अखेरचा भगवा सलाम! शिर्डी शहर शिवसेनेचा निष्ठावंत शिलेदार सुनीलभाऊ परदेशी यांचे निधन टाटा मोटर्सचा उदार हात! २५.६९ लाख रुपयांची टाटा सिएरा श्री साईबाबा संस्थानकडे सुपूर्द शिर्डी पोलीस स्टेशनने ‘दैनिक साई दर्शन’च्या बातमीची घेतली दखल सुगंधित तंबाखू विक्रीप्रकरणी छापा- ४-९... भाच्यानेच केला मामाचा खून! स्थानिक गुन्हे शाखेची 15 दिवसांच्या तपासानंतर उकल
अ.नगरखेळ

मुला – मुलींचे लग्न यावर ‘साई तारा’ ग्रुपतर्फेरविवारी श्रीरामपूरात चर्चासत्र आणी मेळावा

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
सध्याच्या कलियुगामध्ये मुला – मुलींचे लग्न करणे ही एक मोठी समस्या झाली असून त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी श्रीरामपूर येथील ‘ साई तारा ‘ मराठा वधू – वर ग्रुपतर्फे रविवार दि . २१ जुलै २०२४ रोजी ‘ मुला – मुलींचे लग्न ‘ या विषयावर एक दिवसाचे चर्चासत्र व फक्त मराठा समाजातील मुला – मुलींचा वधू – वर मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती साई तारा मराठा ग्रुपचे ॲडमिन निवृत्त प्राध्यापक, पत्रकार रामचंद्र ताराबाई सुंदरदास राऊत यांनी सांगितली.
श्रीरामपूर येथील मेनरोडवरील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या आगाशे सभागृहात रविवार दि. २१ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ . ०० वाजता हे चर्चा सत्र आणी वधू – वर मेळावा आयोजित करण्यात आला असून या चर्चा सत्राची व वधू – वर मेळाव्याची प्रवेश फी फक्त पाचशे रुपये ठेवण्यात आली आहे.
या चर्चा सत्रात अ.नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . माहेश्वरी वीरसिंग गावित , श्रीरामपूर येथील प्राईड ग्रुप ऑफ स्कूलच्या संस्थापिका डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे आणि साई तारा ग्रुपच्या ॲडमिन आणि माजी प्राचार्या रजनीताई रघुनाथ गोंदकर उपस्थित राहून वधू – वर आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करणार असल्याचेही प्रा.राऊत यांनी सांगितले.
आज मुला – मुलींचे लग्न जमविणे एक चिंतेचा विषय झाला आहे. अनुरूप जावई आणि अनुरूप सून मिळावी असे प्रत्येक पालकाला वाटत असते. अशा या मूलभूत प्रश्नावर सामूदायिक चर्चा घडावी व वधू – वरांसह त्यांच्या पालकांना या संदर्भात मार्गदर्शन मिळावे या हेतूने या चर्चा सत्राचे व वधू – वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
हे चर्चासत्र व वधू – वर मेळावा यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे ॲडमिन श्रीमती मीनाताई जगताप , सौ . रामेश्वरी लाटे , श्री . संतोष जगताप पाटील, प्राचार्या रजनीताई गोंदकर व प्रा . रामचंद्र राऊत आणी त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत .
या चर्चासत्रास व मेळाव्यास मराठा समाजतील वधू – वर व त्यांच्या पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे . अधिक माहिती साठी ९२२५ ३१४ ७२९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button