Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
राजकीयशिर्डी

साईदर्शनानंतर नाना पटोलेंचा भाजपावर थेट हल्लाबोल “भाजपा हा गुंडांचा पक्ष-महाराष्ट्राचं विद्रुपीकरण सुरू”

शिर्डी | प्रतिनिधी –
नवीन वर्ष महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण आणि गोरगरीबांसाठी सुखाचं, समृद्धीचं जावं, तसेच काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात व देशात सत्ता मिळावी, असे साकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी श्री साईबाबांच्या चरणी घातले. शिर्डीत साईदर्शनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपावर जोरदार शब्दांत टीका करत राजकीय वातावरण तापवले.
🙏 साईदर्शन घेऊन राजकीय भूमिका स्पष्ट
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी आज शिर्डीत श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सांगितले की,
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांच्या विचारांवर लढल्या जातात. त्यामुळे महायुती स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीत फारसं वेगळं चित्र दिसेल असं मला वाटत नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
🕊️ आम्ही संविधान व सर्वधर्म समभाव मानणारे – पटोले
भाषा व धर्मवादावर बोलताना नाना पटोले म्हणाले,
“आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत. सर्वधर्म समभाव आमचा विचार आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात भाषा व धर्मावर राजकारण होऊ शकत नाही. काही लोक तसे करत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
💣 अजित पवारांमुळे भाजपाचा खरा चेहरा उघड – घणाघात
भाजपावर जोरदार हल्ला चढवताना नाना पटोले म्हणाले,
“अजित पवारांनी भाजपाचा खरा चेहरा उघड केला आहे. कालपर्यंत 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत घेतले, उपमुख्यमंत्री केले आणि अर्थमंत्री करून राज्याच्या तिजोरीची चावी दिली. म्हणजे ‘तुम्ही पैसे लुटा’ असाच संदेश भाजपाने दिला आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
🚨 निवडणुकांत दबावतंत्र; महाराष्ट्राचं विद्रुपीकरण
महानगरपालिका निवडणुकांआधीच महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्यावर बोलताना पटोले म्हणाले,
“निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केली आहे. उमेदवारांवर दबाव टाकणे, अर्ज मागे घेण्यासाठी गुन्हे दाखल करणे—हे प्रकार महाराष्ट्रात सुरू आहेत. हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही,” असे ते म्हणाले.
⚠️ “भाजपा म्हणजे गुंडांचा पक्ष” – थेट आरोप
पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाकडून गुन्हेगारांना तिकीट दिल्याच्या आरोपांवर पटोले म्हणाले,
“भाजपा हा आता गुंडांचा पक्ष झाला आहे. केंद्र असो वा राज्य—भाजपाच्या सत्तेत गुंडगिरी फोफावली आहे. हे अनेक ठिकाणी दिसून येत आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.
✍️ (राजकीय प्रतिनिधी)

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button