Letest News
शिर्डीत मध्यरात्री संशयास्पद हालचाली दुचाकीसह दोघे पोलिसांच्या जाळ्यात! संकटात साई संस्थान ठरले आधारवड!कर्मचाऱ्यास अपघात विम्यापोटी साडेतीन लाखांची मदत पर्युषण महापर्वानिमित्त जिल्ह्यातील कत्तलखाने मांस विक्री केंद्रे बंद जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया य... चाकूचा धाक दाखवून तरुणीला घेऊन पसार! भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण रोशन घेगडमलसह दोघांविरुद्ध तक्रार प्रवीणभाऊ आल्हाट यांची मानवाधिकार असोसिएशनच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती थरावर थर… कौशल्याचा कहर! शिर्डीत सनमित्र-क्रांतीच्या दहीहंडीचा पुन्हा एकदा जल्लोष अहिल्यानगरचा डाग पुसण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची धडपड शिर्डीतील काही पोलिसांमुळे प्रयत्नांना तिलांजल... ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं...
अ.नगरक्राईम

माजी खासदार विखेंवर अॅड. सुरेश लगड यांचा घणाघाती हल्ला “चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत ठेवा”

अहिल्यानगर | प्रतिनिधी
दूध भेसळीविरोधात राज्यभर धडक कारवाई करून भेसळखोरांचे धाबे दणाणून सोडणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्या माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. सुरेश लगड यांनी जोरदार पलटवार केला आहे. “संपूर्ण महाराष्ट्रात भेसळखोरांना वठणीवर आणण्याचे काम करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या कामात खो घालण्याचे काम कोणत्याही राजकीय नेत्याने करू नये. अशा वक्तव्यांमुळे भेसळखोरांचेच मनोबल वाढते,” असा इशारा त्यांनी दिला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


अॅड. लगड म्हणाले की, तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे सामान्य ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळावे, हा उद्देश आहे. त्यामुळे त्यांच्या कामावर शंका घेण्याऐवजी अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे.
विखे यांनी “पूर्वीच्या अधिकाऱ्यांनीही काम केले, मग मुंढे यांनाच एवढी प्रसिद्धी का?” असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर अॅड. लगड यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, “यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनीही अशाच धाडसी पद्धतीने कारवाई केली असती तर त्यांनाही जनतेने डोक्यावर घेतले असते. प्रसिद्धी ही पदामुळे नाही, तर कामामुळे मिळते. चांगले काम करणाऱ्याला शाबासकीची थाप देण्याची दानत ठेवली पाहिजे.”


त्यांनी पुढे आव्हान देत विचारले, “तुकाराम मुंढे यांनी कोणत्या अधिकाऱ्यावर दबाव टाकून खोटे पंचनामे करण्यास सांगितले? असा ठोस पुरावा असेल तर त्याचा सविस्तर खुलासा करावा आणि मुख्यमंत्री यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करावी. केवळ आरोप करून कार्यक्षम अधिकाऱ्याची प्रतिमा मलीन करणे योग्य नाही.”
अॅड. लगड यांनी विखे कुटुंबाच्या राजकीय जबाबदारीची आठवण करून देत म्हटले की, “आपण माजी खासदार आहात. आपले वडील राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे प्रत्येक विधान हे जबाबदारीने आणि विचारपूर्वक केले पाहिजे.”


शेवटी त्यांनी सुचविले की, “दूध भेसळखोरांची बाजू घेण्यापेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर कसा मिळेल, त्यांच्या अडचणी कशा दूर होतील यासाठी प्रयत्न करा. त्यातून लाखो शेतकऱ्यांचे भले होईल आणि तेच आपल्यासाठी खरे लोकहिताचे काम ठरेल.”

“भेसळखोरांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करू नका. चांगले काम करणाऱ्याचे कौतुक करा; भेसळखोरांना अप्रत्यक्ष पाठबळ देणारी वक्तव्ये टाळा. लोकप्रतिनिधींनी जनहिताला प्राधान्य द्यावे.”
— अॅड. सुरेश लगड, ज्येष्ठ विधीज्ञ

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button