Letest News
तलाठी भरतीतील भ्रष्टाचारावर रोहित पवारांचा विखेंवर थेट हल्लाबोल ‘राजीनामा आधी द्या-मग पवारांवर बोला!... शिर्डी संस्थानमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात गोरक्ष गाडीलकरांच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमणांवर आता बुलडोझर ६० दिवसांत कारवाईचे आदेश शिर्डी नगरपरिषदेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी! समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ
अ.नगरक्राईम

अंत्यविधी की रॅली? देशद्रोही बंटी जहागीरदारच्या अंत्यविधी आड गुन्हेगारीचे शक्तीप्रदर्शन

श्रीरामपूर | दैनिक साई दर्शन
हा अंत्यविधी होता की गुन्हेगारीची रॅली?
हा शोकसोहळा होता की दहशतीचे उघड प्रदर्शन?
देशविघातक कृत्यांचे आरोप असलेल्या बंटी जहागीरदारच्या अंत्यविधीला जमलेला प्रचंड जमाव पाहता, संपूर्ण श्रीरामपूरमध्ये हाच संतप्त सवाल उपस्थित झाला आहे. गोळीबारासारख्या गंभीर गुन्ह्यानंतरही आरोपीच्या अंत्यविधीत शक्तीप्रदर्शन, जमावबाजी, भीतीचे वातावरण निर्माण होणे म्हणजे कायद्याला थेट आव्हान असल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे.
या संपूर्ण प्रकाराचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट उल्लेख करत तीव्र शब्दांत समाचार घेतला.
“श्रीरामपूर गोळीबारानंतर देशविघातक कृत्य करणाऱ्या आरोपीच्या समर्थनार्थ जमणारा जमाव समाजासाठी अत्यंत घातक आहे. गुन्हेगारी मानसिकतेचे उदात्तीकरण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही,” असा कडक इशारा त्यांनी दिला.
बंटी जहागीरदार याच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप असताना, त्याच्या अंत्यविधीला मोठ्या प्रमाणात लोक जमणे, काही ठिकाणी घोषणाबाजी, तर काही ठिकाणी दहशत निर्माण करणारे दृश्य पाहायला मिळणे, हा सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर थेट घाला असल्याचे बोलले जात आहे.
हा प्रकार केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूनंतरचा शोक नसून,
👉 गुन्हेगारांना नायक ठरवण्याचा प्रयत्न,
👉 गुन्हेगारीला सामाजिक मान्यता देण्याचा धोका,
👉 तरुण पिढीला चुकीचा संदेश
असे गंभीर परिणाम करणारा असल्याचा आरोप प्रशासन पातळीवरून होत आहे.
“गुन्हेगार कितीही कुख्यात असो, कितीही लोक त्याच्या मागे उभे राहिले तरी कायदा सर्वांसाठी समान आहे. गुन्हेगारांच्या समर्थनार्थ जमाव गोळा करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल,” असा थेट आदेश पालकमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेला दिला आहे.
गुटखा, अवैध धंदे, अमली पदार्थांचा व्यापार आणि बेकायदेशीर शस्त्रांमधून उभ्या राहिलेल्या गुन्हेगारी साखळीमुळेच असे “अंत्यविधी की रॅली?” असे चित्र उभे राहत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावर लगाम घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सीसीटीव्ही विश्लेषण, व्हिडीओ फुटेज तपासणी आणि विशेष पथके तात्काळ सक्रिय करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर बंटी जहागीरदारच्या अंत्यविधीवेळी जमलेल्या जमावाची ओळख, सहभाग, घोषणाबाजी आणि कथित शक्तीप्रदर्शनाची सखोल चौकशी अटळ मानली जात असून, गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्या प्रवृत्तींवर मोठी कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button