Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरक्राईम

विष प्राशन केलेल्या त्या माजी नगरसेवकाचे अखेर निधन ?

कोपरगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा कोल्हे गटाचे माजी नगरसेवक व वर्तमानात राष्ट्रवादी आ.काळे गटाचे कार्यकर्ते स्वप्नील शिवाजी निखाडे (वय-३३) यांचे आज सकाळी १० वाजेच्या सुमारास नाशिक येथे उपचार घेताना निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,एक बहिण,पत्नी एक मुलगा असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

कोपरगाव नगरपरिषद सन-२०१६ च्या नोव्हेंबर मधील निवडणुकीत भाजप तथा कोल्हे गटाकडून निवडणूक जिंकून ते विजयी झाले होते.त्यांना कोल्हे गटाने तरुण असूनही सन-२०२० मध्ये उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती.मात्र नगरपरिषद कार्यकाळ संपल्यावर त्यांचे व कोल्हे गटातील दुसऱ्या फळीतील एका कार्यकर्त्यांचे बिनसले होते.त्यातून त्यांनी कोल्हे गटाचा त्याग केला होता.त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून विद्यमान आ.आशुतोष काळे यांचे समर्थक बनले होते.

त्यांनी आपल्या व्यवसायात बऱ्यापैकी जम बसवला होता.मात्र अलीकडील काळात ते अत्यवस्थ असल्याच्या बातम्या होत्या.त्यातून त्यांनी दि.०७ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्यां सुमारास येवला रोडवर अज्ञात कारणाने दुकानाच्या समोर आपल्याच गाडीत विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला होता.

त्यांना त्यांच्या नजीकच्या नागरिकांनी व आप्तस्वकीयांना तातडीने आधी कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात आणि नंतर नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पहिले ७२ तास जोखमीचे सांगितले होते अशी माहिती आहे.त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती आहे.

दरम्यान त्यांच्या पश्चात रयत शिक्षण संस्थेचे माजी व सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी निखाडे हे वडील असून त्यांच्या निधनाने आ.आशुतोष काळे,माजी आ.अशोक काळे,संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,ऍड.योगेश खालकर,साईनगर येथील चैतन्य मित्र मंडळाच्या सदस्यांनी आदींनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांचेवर कोपरगाव येथील स्मशानभूमीत सायंकाळी ०६ च्या सुमारास अंत्यविधी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button