Letest News
भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश गॅस साठी हवालदिल शिर्डी-24 तासांत व्यवस्था सुधारा अन्यथा आमरण उपोषण – समीर विर यांचा एल्गार शिर्डीत ‘गणेश गॅस एजन्सी’चा काळाबाजार उफाळला रांगेत श्रीमंतांना मागच्या दाराने सिलेंडर – प्रशासन झोप... मध्यरात्री दरोड्याने थरकाप-अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाची दमदार कामगिरी – आंतरजिल... शिर्डीत ‘जमीन सौदा’ बॉम्ब फुटणार? भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या ५० कोटींच्या व्यवहारावर पोलिसांची ...
अ.नगरखेळ

मुला – मुलींचे लग्न यावर ‘साई तारा’ ग्रुपतर्फेरविवारी श्रीरामपूरात चर्चासत्र आणी मेळावा

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
सध्याच्या कलियुगामध्ये मुला – मुलींचे लग्न करणे ही एक मोठी समस्या झाली असून त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी श्रीरामपूर येथील ‘ साई तारा ‘ मराठा वधू – वर ग्रुपतर्फे रविवार दि . २१ जुलै २०२४ रोजी ‘ मुला – मुलींचे लग्न ‘ या विषयावर एक दिवसाचे चर्चासत्र व फक्त मराठा समाजातील मुला – मुलींचा वधू – वर मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती साई तारा मराठा ग्रुपचे ॲडमिन निवृत्त प्राध्यापक, पत्रकार रामचंद्र ताराबाई सुंदरदास राऊत यांनी सांगितली.
श्रीरामपूर येथील मेनरोडवरील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या आगाशे सभागृहात रविवार दि. २१ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ . ०० वाजता हे चर्चा सत्र आणी वधू – वर मेळावा आयोजित करण्यात आला असून या चर्चा सत्राची व वधू – वर मेळाव्याची प्रवेश फी फक्त पाचशे रुपये ठेवण्यात आली आहे.
या चर्चा सत्रात अ.नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . माहेश्वरी वीरसिंग गावित , श्रीरामपूर येथील प्राईड ग्रुप ऑफ स्कूलच्या संस्थापिका डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे आणि साई तारा ग्रुपच्या ॲडमिन आणि माजी प्राचार्या रजनीताई रघुनाथ गोंदकर उपस्थित राहून वधू – वर आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करणार असल्याचेही प्रा.राऊत यांनी सांगितले.
आज मुला – मुलींचे लग्न जमविणे एक चिंतेचा विषय झाला आहे. अनुरूप जावई आणि अनुरूप सून मिळावी असे प्रत्येक पालकाला वाटत असते. अशा या मूलभूत प्रश्नावर सामूदायिक चर्चा घडावी व वधू – वरांसह त्यांच्या पालकांना या संदर्भात मार्गदर्शन मिळावे या हेतूने या चर्चा सत्राचे व वधू – वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
हे चर्चासत्र व वधू – वर मेळावा यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे ॲडमिन श्रीमती मीनाताई जगताप , सौ . रामेश्वरी लाटे , श्री . संतोष जगताप पाटील, प्राचार्या रजनीताई गोंदकर व प्रा . रामचंद्र राऊत आणी त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत .
या चर्चासत्रास व मेळाव्यास मराठा समाजतील वधू – वर व त्यांच्या पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे . अधिक माहिती साठी ९२२५ ३१४ ७२९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button