Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगरराजकीय

शिर्डीच्या भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा-सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीची भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांनी आर.जी.एस. हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या सर्व डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व सहकारी कर्मचाऱ्यांसह संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात नातेपुते येथे हजारो वारकऱ्यांना निस्वार्थ वैद्यकीय सेवा देत समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.
पालखी सोहळ्यातील मोठ्या गर्दीत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत विविध आजारांवर उपचार, प्राथमिक उपचार, औषधोपचार तसेच आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करून संपूर्ण वैद्यकीय पथकाने अत्यंत समर्पित भावनेने सेवा बजावली. या सेवेमुळे अनेक वारकऱ्यांना वेळेत उपचार मिळाले आणि त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर झाला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या सेवाभावी कार्याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिर्डी शहर यांच्या वतीने डॉ. सिमरन साई कोतकर व आर.जी.एस. हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या भावी सामाजिक व वैद्यकीय वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या.
डॉ. सिमरन कोतकर या शिर्डीच्या भूमिपुत्री असून त्यांनी आपल्या कार्यातून शिर्डीच्या सेवाभावी परंपरेला साजेसा आदर्श घालून दिला आहे. “सेवाच खरा धर्म… मानवसेवाच ईश्वरसेवा!” हा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर ठेवला असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button