Letest News
राहता पोलीस ठाण्यात कायदा झोपला होता का?” — निष्क्रिय पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कारभारावर ... ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी देशव्यापी बंद- जिल्ह्यातील सर्व केमिस्टनी बंदमध्ये सहभागी व्हावे... भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले; दत्ता कराळे यांची बदली-खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस वर्तुळ... “ओडीसाच्या साईभक्तेकडून साईचरणी सुवर्ण अर्पण ७.५६ लाखांचे आकर्षक सोन्याचे ब्रोच भेट” गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश...
क्राईमशिर्डी

“श्रद्धा सबुरी पतसंस्था की ४१.९७ कोटींचा स्फोटक खेळ? १४ वर्षांचा हिशेब मागतोय जनतेचा सवाल!

१४ वर्षे ‘ऑल क्लिअर’… आणि आता ४१.९७ कोटींचा भूकंप! ही चूक की संगनमत?
शिर्डी प्रतिनिधी | राहाता तालुका
निमगाव कोराळे येथील श्रद्धा सबुरी पतसंस्था प्रकरणाने आता केवळ आर्थिक अनियमिततेची चौकट ओलांडली आहे. तब्बल ४१ कोटी ९७ लाख रुपयांचा कथित गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर एकच सवाल जिल्हाभर घुमतोय —
“जर सर्व काही सुरळीत होतं, तर हा महाघोटाळा अचानक कुठून उगवला?”
सलग १४ वर्षे लेखापरीक्षण करणारेच लेखापरीक्षक फिर्यादी असल्याची माहिती समोर आल्यानंतर संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे. वर्षानुवर्षे दिलेले ‘स्वच्छ’ अहवाल आता प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🔎 लेखापरीक्षण की लपवाछपवी? जबाबदारीच्या साखळीवर थेट बोट
जर गैरव्यवहार सुरू होता, तर तो दरवर्षीच्या अहवालात का दिसला नाही?
गंभीर निरीक्षणे कुठे गायब झाली?
संस्थेला दिलेली श्रेणी कसल्या आधारावर होती?
राहाता येथील सहाय्यक निबंधक कार्यालय आणि संपूर्ण सहकार नियंत्रण साखळी आता रडारवर आली आहे. “केवळ संचालकांवर गुन्हा दाखल करून जबाबदारी झटकता येणार नाही; लेखापरीक्षण ते मंजुरीपर्यंत प्रत्येक कडीची चौकशी झालीच पाहिजे,” अशी ठाम मागणी ठेवीदारांनी केली आहे.


⚖️ अटक पुरेशी नाही; आमचे पैसे परत द्या!
काही आरोपी अटकेत असले तरी ठेवीदारांच्या जखमा अजून ताज्याच आहेत.
“आयुष्यभराची कमाई अडकली… परतफेडीचा ठोस आराखडा कुठे आहे?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
लवकरच ठेवीदार प्रतिनिधी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय तपासाची मागणी करणार असल्याची माहिती आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्याची मागणीही जोर धरत आहे.


🔥 सत्य बाहेर येईपर्यंत लढा थांबणार नाही!
“१४ वर्षे सर्व काही ठीक होतं की सत्य मुद्दाम दडवण्यात आलं?”
हा प्रश्न आता जनतेच्या मनात पेटलेल्या ज्वालामुखीसारखा धगधगत आहे.
जोपर्यंत जबाबदारीची साखळी उघड होत नाही, दोषींवर कठोर कारवाई होत नाही आणि ठेवीदारांना न्याय मिळत नाही — तोपर्यंत हा संताप शांत होणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button