Letest News
पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद
राजकीयशिर्डी

विद्यार्थिनीच्या भावनिक शब्दांतून गुरुवर्य संदीप सरांचा गौरव- रोशनी-लवीना व समृद्धी लोकचंदानी तसेच दैनिक साईदर्शन परिसराकडून शुभेच्छा

विद्यार्थिनीच्या शब्दांतून गुरुवर्य संदीप सरांचा गौरव; वाढदिवसानिमित्त भावनिक भावना व्यक्त
शिक्षक हा केवळ विषय शिकवणारा नसून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणारा शिल्पकार असतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आपल्या शिक्षकांविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त करताना एका माजी विद्यार्थिनीने आपल्या भावना शब्दांतून मांडत गुरुवर्य संदीप सरांच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत भावनिक संदेश दिला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या संदेशात विद्यार्थिनीने नमूद केले आहे की, “संदीप सर माझ्यासाठी कधीच फक्त शिक्षक नव्हते. देवाकडे ज्या श्रद्धा, आदर आणि भक्तीने पाहिले जाते, त्याच भावनेने मी त्यांच्याकडे पाहते. माझ्या आयुष्यात त्यांच्यासारखा गुरु मिळणं हे माझ्यासाठी मिळालेलं सर्वात मोठं वरदान आहे.”
विद्यार्थिनीने पुढे सांगितले की, संदीप सरांचे ज्ञान अमर्याद असून त्याहूनही अधिक विलक्षण बाब म्हणजे ते ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची पद्धत. “त्यांची शिकवण्याची शैली, संयम, स्पष्टता आणि प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल अशा पद्धतीने विषय मांडण्याची तळमळ अतुलनीय आहे. ते फक्त विषय शिकवत नाहीत, तर विद्यार्थ्यांचा स्वभाव घडवतात आणि आयुष्याला दिशा देतात,” असेही तिने नमूद केले.

आपल्या शालेय जीवनातील अनुभव सांगताना विद्यार्थिनी म्हणते की, आत्मविश्वास हरवलेला असताना संदीप सरांनी नेहमीच पाठीशी उभे राहत प्रोत्साहन दिले. “मी स्वतःवर शंका घेत असताना त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आज माझ्यात जो आत्मविश्वास आहे, त्याचा मोठा वाटा त्यांच्या त्या विश्वासाचा आहे,” असे ती आवर्जून सांगते.
तीन वर्षांपूर्वी शाळेतून बाहेर पडूनही गुरु-शिष्य नात्यात कोणताही बदल झालेला नसल्याचे सांगत विद्यार्थिनी म्हणते, “काळ, अंतर किंवा वर्षं खरी गुरु-शिष्याची नाळ तोडू शकत नाहीत. मी आज वर्गात बसत नसेन, पण मनाने कायम त्यांचीच विद्यार्थिनी आहे.”


संदीप सरांनी दिलेले धडे केवळ अभ्यासापुरते मर्यादित नसून ते आयुष्य, मूल्ये, शिस्त आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचे असल्याचेही विद्यार्थिनीने नमूद केले. वाढदिवसानिमित्त तिने संदीप सरांना उत्तम आरोग्य, आनंद, शांती आणि यश लाभो, तसेच त्यांनी अशाच प्रकारे असंख्य विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवत राहावे, अशी मनापासून प्रार्थना व्यक्त केली.
या भावनिक शब्दांतून एका आदर्श शिक्षकाचा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अमूल्य ठसा स्पष्टपणे दिसून येतो. संदीप सरांसारखे शिक्षक हेच समाजाचे खरे आधारस्तंभ असून त्यांच्या कार्यामुळेच अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळते, हे या भावना पुन्हा एकदा सिद्ध करतात.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button