Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
अ.नगरक्राईम

पत्रकारांवरील हल्ल्याचा कोपरगावात निवेदन देत निषेध राज्य पत्रकार संघाच्या वतीने दिले निवेदन

कोपरगाव प्रतिनिधी- शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तास चे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्ही चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे व पुढारी न्यूज चे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर कार्यरत असणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक, लाथाबुक्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून ही घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा राज्य पत्रकार संघ कोपरगाव तालुका व शहर तसेच तालुक्यातील पत्रकारांनी कोपरगावचे तहसिलदार तसेच कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिस निरीक्षक यांना निवेदन देत निषेध व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.

सदर निवेदन देते प्रसंगी, तालुकाध्यक्ष जनार्दन जगताप, शहराध्यक्ष हफीज शेख, उपशहराध्यक्ष स्वप्नील कोपरे, सचिव विजय कापसे, कार्याध्यक्ष बिपीन गायकवाड, संतोष जाधव, सोमनाथ सोनपसारे, विनोद जवरे, सोमनाथ डफळ, काका खर्डे, रवी जगताप, रवी वाघडकर, विशाल लोंढे, संजय लाड,दिपक जाधव आदी पत्रकारांनी निवेदन दिले.

या निवेदनात म्हटलें आहे की,पत्रकारांवर वारंवार होणारे असे हल्ले ही लोकशाहीला काळिमा फासणारी, चौथ्या स्तंभावर घाला घालणारी गंभीर बाब आहे. पत्रकार समाजातील सत्य घटनांचा आवाज बनतात. अन्याय, भ्रष्टाचार व सामाजिक प्रश्न प्रकाशात आणण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेतात. अशा व्यक्तींवर होणारे हल्ले ही अत्यंत निंदनीय व असह्य बाब आहे.

त्यामुळे आपण सदर प्रकरणातील सर्व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी पावले उचलावी, राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना करण्यात याव्यात,भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने ठोस व प्रभावी धोरण आखावे अशी मागणी निवेदन देत शासनाकडे केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button