Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
राजकीयशिर्डी

साई चरणी ३५०७ किलो सेंद्रिय केशर आंब्याचे अर्पण भाविकांना तीन दिवस आमरसाची मेजवानी

शिर्डी : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नारायणवाडी (नारायणबाग) येथील प्रगतशील शेतकरी श्री. रवी नारायण कराळे यांनी साईबाबांप्रती असलेली आपली श्रद्धा व्यक्त करत तब्बल ३५०७ किलो सेंद्रिय केशर आंबा श्री साई चरणी प्रसाद स्वरूपात अर्पण केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून श्री. कराळे हे पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने केशर आंब्याचे उत्पादन घेत आहेत. कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा घातक औषधांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या दर्जेदार आंब्यामुळे साईभक्तांना आरोग्यदायी आणि शुद्ध आमरसाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या सेंद्रिय केशर आंब्यापासून तयार करण्यात आलेला स्वादिष्ट आमरस आजपासून पुढील तीन दिवस श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालयामध्ये प्रसाद भोजनासोबत भाविकांना दिला जाणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत साईभक्तांसाठी ही खास “आमरस मेजवानी” ठरणार असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
साईबाबांच्या चरणी अर्पण झालेला हा आंबा केवळ फळांचा प्रसाद नसून श्रद्धा, सेवा आणि शुद्धतेचे प्रतीक असल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली. भक्तीभावातून केलेल्या या अनोख्या सेवेमुळे श्री. रवी नारायण कराळे यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
“साईंच्या प्रसादात गोडवा…
आणि भक्तीमध्ये सेंद्रिय सुवास!”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button