Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरराजकीय

शिवरायांचे आदर्श व संपूर्ण चरीत्राचे आचरण आजच्या तरुण पिढीने आत्मसात कऱणे गरजेचे – सौ.ममता पिपाडा

[17:05, 19/2/2025] Gadkari: शिवरायांचे आदर्श व संपूर्ण चरीत्राचे आचरण आजच्या तरुण पिढीने आत्मसात कऱणे गरजेचे – प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने बोलताना व्यक्त केले. यावेळी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा,आरपीयाचे दिलीपराव वाघमारे,मदनलाल पिपाडा,प्रगतशील शेतकरी शिवाजी आनप,महावीर पिपाडा,मदन तारगे,निखील पिपाडा,लिलाबाई पिपाडा आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ.ममता पिपाडा पुढे म्हणाल्या की,ज्यांचे नाव घेताच शत्रुच्या पायाखालची वाळु घसरावी तसेच राज्य कसे चालवावे हा आदर्श संपूर्ण देशासमोर ठेवणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. अशा या शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण सर्वांनी जन्म घेतला हे आपले हे आपले भाग्य आहे. एका गर्जनेतुन दिल्लीचे सिंहासन हलविण्याची ताकद शिवरायांच्या आवाजात होती. अतिशय कल्पक बुद्धी,शत्रुशी दोनहाथ कऱण्यासाठी गणीमीकावे,शत्रुचे मनसुबे धुळीस मिळविण्यात निश्नात होते. रयतेला सोबत घेवुन सुराज्यातून स्वराज्याची संकल्पना मनात ठेवून परकिय आक्रमणातुन राज्याचे व रयतेचे संरक्षण करणारे एकमेव राज्यकर्ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हेच होते.

sai nirman
जाहिरात

शिवरायांनी अवघे आयुष्य रयतेच्या कल्याणासाठी वेचले. मावळ्यांना सोबत घेवुन त्यांनी अनेक गड किल्ले जिंकले. जिजाऊंच्या शुरविरांच्या गोष्टींतुन प्रेरना घेवुन अल्पवयात सर्वच कलांमध्ये पारंगत होवुन राज्याचे सुत्र हातात घेवुन उत्तम शासक बनले. त्यांच्या विचारांची, साहस व धाडसाची,बुद्धीची जयंती साजरी होणे खुप गरजेचे आहे. शिवरायांच्या काळात कुठल्याही राजाने लढाई जिंकली की त्या राज्यातील संपत्ती व स्त्रीयादेखील त्याच्या व्हायच्या. ही क्रूर प्रथा शिवरायांनी बंद केली. त्यांनी शत्रुंच्या स्त्रियांचादेखील आदर केला. त्यांना सुरक्षितता प्रदान केली. आज पावलोपावली महिलांवर अत्याचार, अन्याय होत आहे. जो तरूण शिवरायांना वाचेल, तो तरूण कधीही कुठल्याही परस्त्रीचा अनादर करणार नाही.

    यावेळी उपस्थित सर्वांनी छत्रपती शिवाजी महारांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन केले.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button