Letest News
साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शन वेळेत बदल१० सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता दर्शन प्रक्रिया सुरू नुसते फोटो काढून श्रेय घेता येत नाही पत्रव्यवहार दाखवा!” — खासदार निलेश लंके यांचा सुजय विखेंना घणाघ... साईचरणी पुण्याच्या साईभक्ताची अनमोल भेट१२ लाख ८२ हजारांचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण पंढरपूरच्या विठ्ठल चरणी कमलाकर कोते यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रखुमाईचे दर्शन परिस्थितीला पंक्चर करत साहिलची डॉक्टर होण्याकडे गरुडझेप! वडील पंक्चर काढतात मुलगा आता रुग्णांवर उपचा... गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी CITYMARKET सज्जगणेशमूर्तीपासून सजावटीच्या साहित्यापर्यंत सर्व वस्तू एकाच छत... १४ वर्षांचा भगंदराचा त्रास… ५-६ शस्त्रक्रियांनीही आराम नाही राहात्यात उपचारानंतर पुन्हा मिळाला वैद्य... कोट्यवधींची ‘साई ज्योत’ अर्धवटच! संचालक विठ्ठल पवार यांच्या पाठपुराव्याने प्रकरण ऐरणीवर शिर्डीचे भूमिपुत्र निस्सीम साईभक्त अन् कट्टर शिवसैनिक कमलाकर कोते यांचा आज वाढदिवस सुजय विखेंच्या शिर्डी येथील निकटवर्तीय कार्यकर्त्यावर वाळू तस्करीचा गुन्हा १५.२० लाखांचा मुद्देमाल ज...
राजकीयशिर्डी

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा

शिर्डी : ग्रामीण भागातील होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था यांनी घेतलेला निर्णय अत्यंत कौतुकास्पद मानला जात आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना आता एमएचटी-सीईटीसारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी मोफत निवासी कोचिंगची संधी उपलब्ध होणार आहे.
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात नामांकित आकाश इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण दिले जाणार आहे. इयत्ता दहावीमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन, प्रशिक्षणासह सर्व शैक्षणिक सुविधांची संपूर्ण जबाबदारी संस्थान उचलणार आहे. श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय येथे निवासी स्वरूपात प्रशिक्षण दिले जाणार असून आधुनिक सुविधा आणि अभ्यासपूरक वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, फार्मसी आणि तांत्रिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आर्थिक संकटामुळे शिक्षण थांबण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी साई संस्थानचा हा उपक्रम आशेचा किरण ठरत आहे.
सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणासाठी पुढे आलेल्या साई संस्थानच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, “गरजू विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उचललेले हे पाऊल खऱ्या अर्थाने समाजसेवेचे उदाहरण आहे,” अशा भावना व्यक्त होत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button