Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
अ.नगरक्राईम

तुम्ही किती गलिच्छ आणि खालच्या पातळीवर बोलताय जयश्री थोरात भडकल्या

मी काय वाईट करत होते? मी माझ्या वडिलांसाठी मैदानात होते. माझ्या वडिलांसाठी युवा संवाद यात्रेत फिरण्याचं काम करत होते, प्रत्येक माणसाला भेटण्याचं काम मी करत होते. असं काय वाईट केलं होतं, की माझ्याबद्दल एवढं वाईट बोललं पाहिजे?” अशी नाराजी व्यक्त करत जयश्रीताई यांनी सवाल केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

”जे वक्तव्य करण्यात आलं ते त्यांच्या वयाला शोभणारं आहे का? तुम्ही त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहात. भाषणामध्ये तुम्ही किती गलिच्छ आणि खालच्या पातळीवर बोलताय. त्यांच्या वयाला आणि कुणालाच हे शोभणारं नाहीय”, असं त्या संतप्त झाल्या. हे बरोबर आहे की ते विरोधक राहिलेले आहेत, पण विरोधकाला देखील एक पातळी असते.

त्या एवढ्या खालच्या पातळीला जाऊन तुमच्या मुलीच्या, तुमच्या नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलताय. ते त्यांना शोभणारं नाहीय.”माझ्या आजोबांनी त्यांना आधीसुद्धा खडकावून काढलेलं आहे. त्यांना सरळ करण्याचं काम माझ्या आजोबांनी केलं होतं, मध्यंतरी आमच्या महिलांनी देखील त्यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. अशा माणसाला ते लोकं कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान देतात, तर मला प्रश्न त्यांच्याबाबत पडतो’

‘. सुजय विखेंबाबत जयश्रीताई यांना प्रश्न विचारला गेला असता त्या म्हणाल्या की, ”मला एवढंच त्यांना सांगायचं आहे की, त्यांच्या कार्यक्रमात ते अध्यक्ष होते, त्यांच्या कार्यक्रमात ते बोलते होते, त्यांनी बसवलेले ते अध्यक्ष होते. त्यांनी देखील काही भाषणं मागच्या दिवसात केलेले आहेत, ती तपासून घेतली पाहिजे. चाकूर गावामध्ये त्यांनी देखील माझ्यावर टीका केली आहे. ते स्वत:ला युवानेते म्हणतात ना,

तर त्यांनी युवानेत्याची पातळी जपली पाहिजे. कारण राजकारणात एवढ्या खालच्या पातळीवर जाणारे लोकं कुणीही मान्य करु शकत नाही.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button